शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मानवत बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:42 IST

शहरातील बसस्थानकाची अवस्था बकाल झाली असून परिसरात स्वच्छता न ठेवल्यामुळे या स्थानकाला कचराकुंडीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे बसस्थानकावर ये-जा करणाºया प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : शहरातील बसस्थानकाची अवस्था बकाल झाली असून परिसरात स्वच्छता न ठेवल्यामुळे या स्थानकाला कचराकुंडीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे बसस्थानकावर ये-जा करणाºया प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या बसस्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी खडीचा वापर न करता केवळ मातीचाच वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बसस्थानकात एसटी बसने प्रवेश करताच धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे प्रवाशांच्या आजाराला निमंत्रण मिळत आहे. धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच बसस्थानकातील प्रवाशांना बस ओळखता यावी, यासासाठी स्थानकातील फलाटावर शहरांची नावे असलेले फलक लावण्यात आले आहेत. मात्र फलाट क्रमांक १ वरील गावांच्या नावाचा फलकच गायब झाला आहे.बसस्थानकात बस थांबण्यासाठी सहा फलाट उभाण्यात आले आहेत. मात्र बसचालक आपली बस फलाटावर न लावता १०० फूट दूरच उभी करतात. यामुळे वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुले यांना दूरवर जाऊन बसमध्ये चढावे लागते. घाई, गडबडीत अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असल्याने बसस्थानकातील फलाट नावालाच असल्याचे दिसून येत आहे. येणाºया प्रवाशांना बसच्या वेळा लक्षात येण्यासाठी लावण्यात आलेले बसचे वेळापत्रक मागील दोन ते तीन वर्षापूर्वीचे आहे. सद्य स्थितीत बसच्या वेळा बदललेल्या असताना बसस्थानकात जुनेच वेळापत्रक असल्याने बस पकडताना प्रवाशांची तारंबळ उडत आहे.अनेक वेळा प्रवाशांना बसस्थानकातच ताटकळत बसावे लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन बसस्थानकात मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशातून होत आहे. परंतु, या प्रकाराकडे मानवत येथील एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.