शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

पुरामुळे २६ गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:07 IST

शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे कसुरा, इंद्रायणी, लेंडी या नद्यांना पूर आला़ तर पिंगळगड, धामोणी, धरमोडी या ओढ्यांसह अनेक छोट्या ओढ्यांना पूर आल्याने तब्बल २६ गावांचा संपर्क तुटला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे कसुरा, इंद्रायणी, लेंडी या नद्यांना पूर आला़ तर पिंगळगड, धामोणी, धरमोडी या ओढ्यांसह अनेक छोट्या ओढ्यांना पूर आल्याने तब्बल २६ गावांचा संपर्क तुटला होता़ रविवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती़ दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर दाखल झालेल्या पावसामुळे शेतकºयांत समाधानाचे वातावरण आहे.परभणी जिल्ह्यात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली आहे़ ३८ मंडळांपैकी ४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता़ या पावसामुळे यावर्षी प्रथमच ओढे, नाले खळाळून वाहिले़ परभणी तालुक्यातील इंद्रायणी नदीला पूर आला तर पिंगळगड नाल्याला आलेल्या पुरामुळे विद्यापीठातून जाणारा रस्ता बंद झाला होता़ परिणामी बलसा, सायाळा, शेंद्रा, रायपूर, लोहगाव या गावांचा संपर्क तुटला होता़ धामोडी ओढ्याला पूर आल्याने या परिसरातील नांदखेडा, करडगाव, सनपुरी, धारणगाव, हिंगला, वाडी दमई, साटला, सुलतानपूर या गावांचा संपर्क तुटला होता़पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी या सहा गावांचा संपर्क तुटला होता़ त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील कोल्हा-कोथाळा रस्त्यावरील धरमोडा ओढ्याला पूर आल्याने कोथाळा, सोमठाणा, आटोळा, राजुरा, नरळद, टाकळी नीलवर्ण, शेवडी या सात गावांना जाणाºया रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. सेलू तालुक्यामध्ये कसुरी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता़ तसेच वालूर गावाकडे जाणाºया रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़