शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

पुरामुळे २६ गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:07 IST

शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे कसुरा, इंद्रायणी, लेंडी या नद्यांना पूर आला़ तर पिंगळगड, धामोणी, धरमोडी या ओढ्यांसह अनेक छोट्या ओढ्यांना पूर आल्याने तब्बल २६ गावांचा संपर्क तुटला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे कसुरा, इंद्रायणी, लेंडी या नद्यांना पूर आला़ तर पिंगळगड, धामोणी, धरमोडी या ओढ्यांसह अनेक छोट्या ओढ्यांना पूर आल्याने तब्बल २६ गावांचा संपर्क तुटला होता़ रविवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती़ दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर दाखल झालेल्या पावसामुळे शेतकºयांत समाधानाचे वातावरण आहे.परभणी जिल्ह्यात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली आहे़ ३८ मंडळांपैकी ४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता़ या पावसामुळे यावर्षी प्रथमच ओढे, नाले खळाळून वाहिले़ परभणी तालुक्यातील इंद्रायणी नदीला पूर आला तर पिंगळगड नाल्याला आलेल्या पुरामुळे विद्यापीठातून जाणारा रस्ता बंद झाला होता़ परिणामी बलसा, सायाळा, शेंद्रा, रायपूर, लोहगाव या गावांचा संपर्क तुटला होता़ धामोडी ओढ्याला पूर आल्याने या परिसरातील नांदखेडा, करडगाव, सनपुरी, धारणगाव, हिंगला, वाडी दमई, साटला, सुलतानपूर या गावांचा संपर्क तुटला होता़पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी या सहा गावांचा संपर्क तुटला होता़ त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील कोल्हा-कोथाळा रस्त्यावरील धरमोडा ओढ्याला पूर आल्याने कोथाळा, सोमठाणा, आटोळा, राजुरा, नरळद, टाकळी नीलवर्ण, शेवडी या सात गावांना जाणाºया रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. सेलू तालुक्यामध्ये कसुरी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता़ तसेच वालूर गावाकडे जाणाºया रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़