शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

कालबाह्यझालेल्या उपकरणामुळे चारठाणकरांचा जीव धोक्यात

By admin | Updated: September 13, 2014 23:05 IST

चारठाणा : वीजपुरवठा करणाऱ्या कालबाह्य उपकरणामुळे चारठाणा व परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

चारठाणा : वीजपुरवठा करणाऱ्या कालबाह्य उपकरणामुळे चारठाणा व परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. लोखंडी खांबावर गंज लागल्याने व सिमेंटचे खांब फुटल्याने ते कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे. जवळपास ४०-४५ वर्षांपासून वीजतारा बदललेल्या नाहीत. त्यामुळे शेकडो ठिकाणी तारांना जोड दिले जातात. या तारा एकमेकांना चिटकू नये, म्हणून त्यावर दगड बांधलेले आहेत. त्यामुळे हाताला लागतील एवढ्या खाली तारा लटकलेल्या असतात. तारा जमिनीवर पडून अनेकवेळा दुर्घटनाही घडल्या आहेत. एकाच महिन्यात तीन वेळा एकाच रोहित्रास आग लागली होती. तरीही त्याची तात्पुरती डागडुजी करून पुन्हा पुन्हा जनतेच्या जीवितास धोका निर्माण केला जात आहे. काही वर्षांपूर्वी गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती याचेच बळी ठरले होते. विद्युत प्रवाह चालू असलेल्या तारा तुटून कडबा व घरे जळाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटनाही घडली होती. याविषयी नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने दिली. परंतु फरक पडला नाही. यापूर्वी गावात अनेक वीज अपघात झाले तरी परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच बिकट होत आहे. कालबाह्य व जीवघेण्या वीज तारा, जीर्ण अवस्थेतील खांब, विद्युत उपकरणे यामुळे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. तशी यापुढे होऊ नये म्हणून तालुका दंडाधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चारठाणा येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)