शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्यझालेल्या उपकरणामुळे चारठाणकरांचा जीव धोक्यात

By admin | Updated: September 13, 2014 23:05 IST

चारठाणा : वीजपुरवठा करणाऱ्या कालबाह्य उपकरणामुळे चारठाणा व परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

चारठाणा : वीजपुरवठा करणाऱ्या कालबाह्य उपकरणामुळे चारठाणा व परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. लोखंडी खांबावर गंज लागल्याने व सिमेंटचे खांब फुटल्याने ते कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे. जवळपास ४०-४५ वर्षांपासून वीजतारा बदललेल्या नाहीत. त्यामुळे शेकडो ठिकाणी तारांना जोड दिले जातात. या तारा एकमेकांना चिटकू नये, म्हणून त्यावर दगड बांधलेले आहेत. त्यामुळे हाताला लागतील एवढ्या खाली तारा लटकलेल्या असतात. तारा जमिनीवर पडून अनेकवेळा दुर्घटनाही घडल्या आहेत. एकाच महिन्यात तीन वेळा एकाच रोहित्रास आग लागली होती. तरीही त्याची तात्पुरती डागडुजी करून पुन्हा पुन्हा जनतेच्या जीवितास धोका निर्माण केला जात आहे. काही वर्षांपूर्वी गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती याचेच बळी ठरले होते. विद्युत प्रवाह चालू असलेल्या तारा तुटून कडबा व घरे जळाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटनाही घडली होती. याविषयी नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने दिली. परंतु फरक पडला नाही. यापूर्वी गावात अनेक वीज अपघात झाले तरी परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच बिकट होत आहे. कालबाह्य व जीवघेण्या वीज तारा, जीर्ण अवस्थेतील खांब, विद्युत उपकरणे यामुळे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. तशी यापुढे होऊ नये म्हणून तालुका दंडाधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चारठाणा येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)