शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

निवडणूक कामामुळे ‘एसटी’च्या १३ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 19:19 IST

दोन दिवसांत सुमारे १३ हजार कि.मी.च्या फेऱ्या रद्द

औरंगाबाद :  मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी २२ आणि २३ एप्रिल रोजी २२३ बसगाड्या पाठविण्यात आल्या. यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या दोन दिवसांत सुमारे १३ हजार कि.मी.च्या फेऱ्या रद्द झाल्या. जिल्ह्यातील इतर आगारांतील रद्द झालेल्या फेऱ्यांचा बुधवारी आढावा घेण्यात येणार आहे. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील विविध आगारांतून या बसेस पुरविण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण बसेसची संख्या ५५० वर आहे. त्यातील २२३ बसेस दोन दिवस निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्या. त्यामुळे दोन दिवस कमी गर्दीच्या मार्गावरील बसेस रद्द करण्यात आल्या. मतदानामुळे मंगळवारी प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती; परंतु नोकरी, व्यवसायानिमित्त पुण्याला गेलेले नागरिक मतदानासाठी शहरात दाखल झाले होते. मतदानानंतर परतीच्या प्रवासामुळे पुणे मार्गावरील बसेसना प्रवाशांची गर्दी होती.

७० फेऱ्या रद्दमध्यवर्ती बसस्थानक ाचे आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) एस.ए. शिंदे म्हणाले की, सोमवारी सुमारे ६ हजार कि.मी. अंतरच्या फेऱ्या रद्द झाल्या, तर मंगळवारी ७० फेऱ्या रद्द झाल्या. त्यातून सुमारे ७ हजार कि.मी. अंतर रद्द झाले. मतदानामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती; परंतु पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी केली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019