शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस वर्षांपासून नळयोजना बंद पडल्याने ग्रामस्थांचे हाल

By admin | Updated: May 14, 2014 01:02 IST

इरफान सिद्दीकी, हट्टा तब्बल २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे नळयोजना बंद असल्याने हट्टा येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

इरफान सिद्दीकी, हट्टा तब्बल २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे नळयोजना बंद असल्याने हट्टा येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी शासनाने ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, या उदात्त हेतूने वाडी (सु.) येथील पूर्णा नदीशेजारी विहीर बांधली. तेथून हट्टा येथील जलकुंभापर्यंत पाईपलाईन टाकून पाणी आणण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्या निकृष्ट दर्जाच्या पाईपला अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाणी काही जलकुंभापर्यंत पोहोचलेच नाही. दरम्यान, शासनाने पूर्वीची नळयोजना बंद केल्यानंतर गावातील बोअरवरून पुन्हा निधी देऊन सर्व पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु त्याही पाईपलाईनला गळती लागल्याने पाणी जलकुंभापर्यंत पोहोचले नाही. २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या जलकुंभावरील लोखंडी कठडे गायब झाले असून, लाखो रुपये खर्चून नळाला पाणी आले नाही. पाण्यासाठी बांधलेल्या तोट्या आता गायब झाल्या आहेत. गतवर्षी शासनातर्फे नळयोजनेसाठी सर्वे करण्यात आला. नवीन नळयोजनेसाठी ग्रामपंचायतीच्या पाठीमागील जागेत विहीर बांधून तेथून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम होणार असल्याची चर्चा झाली. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी सर्वे केला; परंतु या नवीन नळयोजनेच्या सर्वेचे काय झाले? हे मात्र ग्रामस्थांना कळाले नाही. लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी २५ वर्षांपासून बंद पडलेल्या नळयोजनेकडे लक्ष न दिल्याने ग्रामस्थांना दरवर्षी भटकंती करावी लागत आहे.