शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

By admin | Updated: May 6, 2017 00:16 IST

उस्मानाबाद : लातूर- मुंबई एक्सप्रेस रेल्वे पूर्ववत लातूर येथील रेल्वे स्थानकावरूनच सोडावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : लातूर- मुंबई एक्सप्रेस रेल्वे पूर्ववत लातूर येथील रेल्वे स्थानकावरूनच सोडावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले़मुंबई - लातूर ही एक्सप्रेस रेल्वे बिदरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती़ शुक्रवारी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी विधीज्ञ मंडळ, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, रेल्वे लोक आंदोलन समिती, सेव फार्मर्स विजेस् व ड्रगिस्ट असोसिएशन, रोटरी क्लब, जिल्हा मराठी पत्रकार संघ, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते़ त्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून शासन निर्णयाचा निषेध नोंदविला़ या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून ९ मे रोजी उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला़ वाशी येथील व्यापारी संघाने बाजारपेठ बंद ठेवून जिल्हास्तरीय व्यापारी संघाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. व्यापारी संघाने अचानकपणे बाजारपेठ बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. हॉटेलचालकासह इतर छोट्या व्यावसायिंकांनाही याचा फटका सहन करावा लागला़ या बंदमध्ये व्यापारी संघाचे अध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे, सचिव अ‍ॅड.प्रवीण पवार, सूर्यंकांत मोळवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.