शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘फासे पारधी’ समजून केले पोलिसांच्या हवाली

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भिक्षा मागत बेंबळी येथे रविवारी सकाळी फिरणाऱ्या दोघांना, खेकडे पकडण्यासाठी शिंगोली

उस्मानाबाद : पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भिक्षा मागत बेंबळी येथे रविवारी सकाळी फिरणाऱ्या दोघांना, खेकडे पकडण्यासाठी शिंगोली तांड्याच्या परिसरात फिरणाऱ्या तिघांना व येडशी येथे एकाला ‘फासे पारधी’ असल्याचा संशय घेत त्यांना पकडून नागरिकांनी पोलीस ठाण्यात नेले़ पोलिसांसमक्ष झालेल्या ओळखपरेडमध्ये तिन्ही ठिकाणच्या पाचही जणांची ओळख पटल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले़जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ‘फासे पारधी’ आल्याची व लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची मोठी अफवा पसरली आहे़ गावातील प्रत्येक घरोघरी हा विषय चर्चिला जात आहे़ पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी अफवा असल्याचे सांगूनही नागरिकांच्या मनामध्ये पसरविलेल्या अफवेची अधीकच दहशत बसल्याचे दिसत आहे़ ‘फासे पारधी’ अफवेची दहशत किती मोठी पसरली आहे, याची प्रचिती रविवारी आली़ उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील दोन इसम रविवारी सकाळी बेंबळी गावातील घरोघरी,काही दुकानांमध्ये भिक्षा मागत होते़ त्या इसमांची वेषभूषा आणि डोळे पाहिल्यानंतर ते दोघे ‘फासे पारधी’ असल्याचा संशय काही नागरिकांना आला़ त्यांनी तत्काळ त्या दोघांना पकडून पोलीस ठाण्यात नेले़ पोलिसांनी त्या दोन इसमांची चौकशी केली़ विशेष म्हणजे काही वेळानंतर त्या इसमांना पाहण्यासाठी ठाण्यात आलेल्यांपैकी काहींनी ते समुद्रवाणीचे रहिवाशी असल्याचे सांगितले़ त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले़ शिंगोली तांडा परिसरात येडशी परिसरातील तिघे खेकडे धरण्यासाठी फिरत होते़ त्यांनाही नागरिकांनी चोरटे समजून पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले़ चौकशीनंतर त्यांची ओळख पटल्याने नागरिकांनी त्यांना सोडून दिले़ तर येडशी गावातही एका इसमाला चोर समजून दूरक्षेत्रात नेण्यात आले होते़ मात्र, चौकशीनंतर तो इसम नांदेड भागातील रहिवाशी असल्याचे समोर आले़ एकूणच रविवारी घडलेले प्रकार केवळ अफवेमुळे घडल्याचे दिसत आहे़