शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

कृउबामध्ये धान्याची आवक निम्म्यावर

By admin | Updated: June 9, 2015 00:16 IST

बीड : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिके पिकली नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाऱ्यांची संख्या निम्म्याने घटली.

बीड : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिके पिकली नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाऱ्यांची संख्या निम्म्याने घटली. येथे अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृउबात धान्य आणण्यास पाठ फिरवली. याचा परिणाम कृउबाच्यसा उत्पन्नावरही जाणवला.े मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उसनवारीच्या पैशावर शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र, शेतकऱ्यांना अपक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. खरीपासह रबी पिकांनीही दगा दिल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन, कापूस या पिकांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हाती निम्मेच उत्पादन पडले. त्यामुळे शेतकरी खचून गेला. सध्या बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीला १५५० ते २२०० रूपये भाव आहे. बाजरीला १३०० ते १६०० तर गव्हाला १८०० ते २५०० रूपये भाव दिला जात असल्याचे सचिव आर. पी. बहीर यांनी सांगितले. भाव पडले, आवकही घटली गतवर्षी बीड कृउबाअंतर्गत साडेपाच लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. ४५०० ते ४६०० रूपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळाला. यावर्षी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान कापूस खरेदी झाली. यावर्षी मात्र, केवळ साडेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी होऊन चार हजार ते ४१०० रूपये प्रती क्विंटल कापसाला भाव मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. तूर सात हजाराने घटली गतवर्षी तुरीची आवक १२ हजार क्विंटल एवढी होती. ४३०० रूपये भाव तुरीला मिळाली. यावर्षी मात्र तुरीच्या भावात २०० रूपये वाढ होऊन भाव ४५०० रूपये झाला. आवक मात्र पाच हजार क्विंटलच झाली, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)