शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

२ लाख हेक्टरवर दुष्काळी छाया

By admin | Updated: July 21, 2015 00:20 IST

औरंगाबाद : तब्बल महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील किमान २ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल,

औरंगाबाद : तब्बल महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील किमान २ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल, अशी माहिती जि. प. कृषी विभागाच्या सूत्राने दिली. चार-पाच वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच मृगाचा चांगला पाऊस झाल्यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्यांनी मागचा- पुढचा विचार न करता तब्बल ८०-९० टक्के पेरण्या उरकल्या. पुढे काही दिवसांतच पावसाने आड धरली ती आजपर्यंत. आणखी ३० तारखेपर्यंत अशीच स्थिती राहिली, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल. मृगाच्या पावसाने सुखावलेल्या शेतकऱ्यांनी आणखी पुढे पाऊस पडेल, या आशेवर कापूस, मका, सोयाबीन, संकरित ज्वारी, तूर, उडीद, मूग आदी पिकांच्या पेरण्या उरकून घेतल्या. पिकेही चांगल्या प्रमाणात उगवून आली होती; मात्र नंतर पावसाने दडी मारल्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून वारा सुटल्यामुळे ढग गायब होत आहेत. या स्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. बाजारपेठांमध्ये उत्साह नाही. सर्व व्यवहार मंदावले आहेत.