शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची केली चेष्टा

By admin | Updated: January 2, 2016 23:59 IST

नजीर शेख , औरंगाबाद राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असले तरी अनेक महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसुली चालूच ठेवली आहे.

नजीर शेख , औरंगाबादराज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असले तरी अनेक महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसुली चालूच ठेवली आहे. त्यामुळे शुल्क माफीवरून राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण तसेच महसूल विभागाने विद्यार्थ्यांची अक्षरश: चेष्टा चालविल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. राज्य शासनाने ७ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा फी घेण्यात येऊ नये, असे आदेश जारी केले. ज्या गावांची अंतिम पैसेवारी कमी आहे, अशा गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी कार्यवाही करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केले आहेत. सध्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा फॉर्म भरण्याचे काम सुरूआहे. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणे चालू ठेवले आहे. शासनाकडून फीची रक्कम आल्यास विद्यार्थ्यांना ती परत केली जाईल, असे महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यामुळे शासनाने परीक्षा शुल्क माफ करूनदेखील त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळालाच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये १६ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आहे. या मुदतीत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले. एका महाविद्यालयातील प्राचार्यांनी सांगितले की, शासनाचे स्पष्ट आदेश आमच्यापर्यंत पोहोचले नसल्याने विद्यार्थ्यांकडून फी घ्यावी लागली. विभागांमधील गोंधळदरम्यान, प्राप्त माहितीनुसार उच्च शिक्षण विभाग आणि महसूल विभाग यामधील गोंधळाच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आदेश जारी करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी महसूल विभागाने आर्थिक नियोजन करावे, असे म्हटले आहे. या गोंधळात विद्यार्थ्यांना सध्या तरी आर्थिक जुळवाजुळव करावी लागली आहे. राज्य शासनाच्या आदेशात केवळ अनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाच माफी मिळेल, असे सांगण्यात आल्याने विनाअनुदानित महाविद्यालयांतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्याचाही प्रयत्न शासनाने केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.