शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची केली चेष्टा

By admin | Updated: January 2, 2016 23:59 IST

नजीर शेख , औरंगाबाद राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असले तरी अनेक महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसुली चालूच ठेवली आहे.

नजीर शेख , औरंगाबादराज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असले तरी अनेक महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसुली चालूच ठेवली आहे. त्यामुळे शुल्क माफीवरून राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण तसेच महसूल विभागाने विद्यार्थ्यांची अक्षरश: चेष्टा चालविल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. राज्य शासनाने ७ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा फी घेण्यात येऊ नये, असे आदेश जारी केले. ज्या गावांची अंतिम पैसेवारी कमी आहे, अशा गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी कार्यवाही करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केले आहेत. सध्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा फॉर्म भरण्याचे काम सुरूआहे. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणे चालू ठेवले आहे. शासनाकडून फीची रक्कम आल्यास विद्यार्थ्यांना ती परत केली जाईल, असे महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यामुळे शासनाने परीक्षा शुल्क माफ करूनदेखील त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळालाच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये १६ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आहे. या मुदतीत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले. एका महाविद्यालयातील प्राचार्यांनी सांगितले की, शासनाचे स्पष्ट आदेश आमच्यापर्यंत पोहोचले नसल्याने विद्यार्थ्यांकडून फी घ्यावी लागली. विभागांमधील गोंधळदरम्यान, प्राप्त माहितीनुसार उच्च शिक्षण विभाग आणि महसूल विभाग यामधील गोंधळाच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आदेश जारी करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी महसूल विभागाने आर्थिक नियोजन करावे, असे म्हटले आहे. या गोंधळात विद्यार्थ्यांना सध्या तरी आर्थिक जुळवाजुळव करावी लागली आहे. राज्य शासनाच्या आदेशात केवळ अनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाच माफी मिळेल, असे सांगण्यात आल्याने विनाअनुदानित महाविद्यालयांतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्याचाही प्रयत्न शासनाने केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.