शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची केली चेष्टा

By admin | Updated: January 2, 2016 23:59 IST

नजीर शेख , औरंगाबाद राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असले तरी अनेक महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसुली चालूच ठेवली आहे.

नजीर शेख , औरंगाबादराज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असले तरी अनेक महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसुली चालूच ठेवली आहे. त्यामुळे शुल्क माफीवरून राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण तसेच महसूल विभागाने विद्यार्थ्यांची अक्षरश: चेष्टा चालविल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. राज्य शासनाने ७ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा फी घेण्यात येऊ नये, असे आदेश जारी केले. ज्या गावांची अंतिम पैसेवारी कमी आहे, अशा गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी कार्यवाही करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केले आहेत. सध्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा फॉर्म भरण्याचे काम सुरूआहे. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणे चालू ठेवले आहे. शासनाकडून फीची रक्कम आल्यास विद्यार्थ्यांना ती परत केली जाईल, असे महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यामुळे शासनाने परीक्षा शुल्क माफ करूनदेखील त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळालाच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये १६ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आहे. या मुदतीत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले. एका महाविद्यालयातील प्राचार्यांनी सांगितले की, शासनाचे स्पष्ट आदेश आमच्यापर्यंत पोहोचले नसल्याने विद्यार्थ्यांकडून फी घ्यावी लागली. विभागांमधील गोंधळदरम्यान, प्राप्त माहितीनुसार उच्च शिक्षण विभाग आणि महसूल विभाग यामधील गोंधळाच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आदेश जारी करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी महसूल विभागाने आर्थिक नियोजन करावे, असे म्हटले आहे. या गोंधळात विद्यार्थ्यांना सध्या तरी आर्थिक जुळवाजुळव करावी लागली आहे. राज्य शासनाच्या आदेशात केवळ अनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाच माफी मिळेल, असे सांगण्यात आल्याने विनाअनुदानित महाविद्यालयांतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्याचाही प्रयत्न शासनाने केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.