शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

जिल्ह्यात यंदाही दुष्काळच..!

By admin | Updated: September 10, 2016 00:28 IST

विजय सरवदे, औरंगाबाद अजूनही मोठ्या पावसाचे काही नक्षत्र शिल्लक आहेत; परंतु यापुढे मोठे पाऊस झाले तरी केवळ दरवाजांअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सर्व पाणी वाहून जाणार आहे.

विजय सरवदे, औरंगाबादयावर्षी जिल्ह्यात सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस झाला. अजूनही मोठ्या पावसाचे काही नक्षत्र शिल्लक आहेत; परंतु यापुढे मोठे पाऊस झाले तरी केवळ दरवाजांअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सर्व पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीण नागरिकांच्या नशिबी पुन्हा दुष्काळ आणि पाणीटंचाई कायम राहील, हे मात्र नक्की!मागील काही वर्षांपासून अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे चोरीला गेलेले आहेत, तर काहींचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पावसाचे पाणी अडवण्यास जिल्हा परिषदेला अपयश येत होते. गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता जि.प.चे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे बदलण्याचा निर्णय घेतला. ३५०० दरवाजे खरेदी करण्यासाठी उपकरातील तब्बल २.५ कोटी रुपये, तर दरवाजांना रबरी सील बसविण्यासाठी ५० लाखांची तरतूदही करण्यात आली. त्यानुसार जि.प.च्या सिंचन विभागाने दरवाजे खरेदीसाठी अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता घेण्यासाठी ते जलसंधारण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले होते. या प्रक्रियेला जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला; पण अद्यापही तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे दरवाजे खरेदीची प्रक्रिया ठप्प राहिली. आता तांत्रिक मान्यता मिळाली तरी तिचा या वर्षासाठी फारसा उपयोग होणार नाही. नियमानुसार आॅक्टोबर महिन्यामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करावे लागतात. ज्यामुळे त्यात पाणी अडून भोवतालची जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होते. आता तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेला ई- टेंडरिंग करावी लागेल. त्यानंतर दहा दिवसांनी निविदा उघडल्या जातील. पुढे सर्वसाधारण सभेची दरवाजांच्या दरास मान्यता घ्यावी लागेल. पुढे मग पुरवठादार संस्थेस पुरवठा आदेश द्यावे लागतील. तेथून पुढे ४५ दिवसांच्या आत दरवाजांचा पुरवठा करून ते बसवावे लागतील. तोपर्यंत आॅक्टोबर महिना उलटून जाईल आणि दरवाजे न बसवल्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सारे पाणी वाहून जाईल. परिणामी, कोल्हापुरी बंधारे नजीकची लाखो एकर शेती पुन्हा सिंचनापासून वंचित राहणार. काही बंधाऱ्यांना दरवाजे आहेत; पण रबरी सील खराब झाल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. किमान रबरी सील खरेदीची प्रक्रिया जिल्हा परिषदेने राबवणे अपेक्षित होते; पण रबरी सील खरेदीची प्रक्रियाही थांबलेली आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याच्या नशिबी दरवर्षाप्रमाणे यंदाही दुष्काळच राहणार आहे, हे विशेष!