शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदाही दुष्काळच..!

By admin | Updated: September 10, 2016 00:28 IST

विजय सरवदे, औरंगाबाद अजूनही मोठ्या पावसाचे काही नक्षत्र शिल्लक आहेत; परंतु यापुढे मोठे पाऊस झाले तरी केवळ दरवाजांअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सर्व पाणी वाहून जाणार आहे.

विजय सरवदे, औरंगाबादयावर्षी जिल्ह्यात सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस झाला. अजूनही मोठ्या पावसाचे काही नक्षत्र शिल्लक आहेत; परंतु यापुढे मोठे पाऊस झाले तरी केवळ दरवाजांअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सर्व पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीण नागरिकांच्या नशिबी पुन्हा दुष्काळ आणि पाणीटंचाई कायम राहील, हे मात्र नक्की!मागील काही वर्षांपासून अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे चोरीला गेलेले आहेत, तर काहींचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पावसाचे पाणी अडवण्यास जिल्हा परिषदेला अपयश येत होते. गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता जि.प.चे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे बदलण्याचा निर्णय घेतला. ३५०० दरवाजे खरेदी करण्यासाठी उपकरातील तब्बल २.५ कोटी रुपये, तर दरवाजांना रबरी सील बसविण्यासाठी ५० लाखांची तरतूदही करण्यात आली. त्यानुसार जि.प.च्या सिंचन विभागाने दरवाजे खरेदीसाठी अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता घेण्यासाठी ते जलसंधारण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले होते. या प्रक्रियेला जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला; पण अद्यापही तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे दरवाजे खरेदीची प्रक्रिया ठप्प राहिली. आता तांत्रिक मान्यता मिळाली तरी तिचा या वर्षासाठी फारसा उपयोग होणार नाही. नियमानुसार आॅक्टोबर महिन्यामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करावे लागतात. ज्यामुळे त्यात पाणी अडून भोवतालची जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होते. आता तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेला ई- टेंडरिंग करावी लागेल. त्यानंतर दहा दिवसांनी निविदा उघडल्या जातील. पुढे सर्वसाधारण सभेची दरवाजांच्या दरास मान्यता घ्यावी लागेल. पुढे मग पुरवठादार संस्थेस पुरवठा आदेश द्यावे लागतील. तेथून पुढे ४५ दिवसांच्या आत दरवाजांचा पुरवठा करून ते बसवावे लागतील. तोपर्यंत आॅक्टोबर महिना उलटून जाईल आणि दरवाजे न बसवल्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सारे पाणी वाहून जाईल. परिणामी, कोल्हापुरी बंधारे नजीकची लाखो एकर शेती पुन्हा सिंचनापासून वंचित राहणार. काही बंधाऱ्यांना दरवाजे आहेत; पण रबरी सील खराब झाल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. किमान रबरी सील खरेदीची प्रक्रिया जिल्हा परिषदेने राबवणे अपेक्षित होते; पण रबरी सील खरेदीची प्रक्रियाही थांबलेली आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याच्या नशिबी दरवर्षाप्रमाणे यंदाही दुष्काळच राहणार आहे, हे विशेष!