शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दुष्काळी ढग अन् इच्छुकांचे पीक

By admin | Updated: August 20, 2014 00:24 IST

विजय पाटील, हिंगोली देशात कॉंग्रेसविरोधी लाट असताना हिंगोली लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात गेली. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांसाठी हा आशेचा किरण आहे.

विजय पाटील, हिंगोलीदेशात कॉंग्रेसविरोधी लाट असताना हिंगोली लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात गेली. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांसाठी हा आशेचा किरण आहे. मात्र त्यावेळी नसलेली लाट आता येईल, असा भाजपा-सेना युतीचा होरा आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ असला तरी राजकीय पक्षांकडे इच्छुकांचे पीक आले आहे. परिणामी, योग्य मशागत न झाल्यास बंडाळीचे तण डोके वर काढणार यात शंका नाही.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागेल, अशी स्थिती आहे. हिंगोलीचे विद्यमान आ.भाऊराव पाटील गोरेगावकर व वसमतचे आ.जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी निश्चितच असल्यात जमा आहे. त्यामुळे येथे सत्ताधाऱ्यांत तेवढी चलबिचल नसली तरी विरोधी गटात उमेदवारीसाठी अनेकांचे देव पाण्यात आहेत. कळमनुरीतील राजीव सातव हे आता खासदार झाले आहेत. त्यामुळे येथे कॉंग्रेसमध्ये किमान ९ जणांना उमेदवारी पाहिजे आहे. प्रमुखांपैकी डॉ.संतोष टारफे, संजय बोंढारे, दिलीपराव देसाई, गयबाराव नाईक, जकी कुरेशी ही नावे चर्चेत आहेत. येथे सर्वांनी एकमत करून हा आकडा दोन ते चारपर्यंत खाली आणला तर उमेदवारी न मिळाल्याचा हिरमोड टाळता येणार आहे. शिवाय लोकसभेला जी एकजूट दाखविली तीच पुढे राहिली तरच सगळे सुरळीत होईल. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसही ही जागा आता पुन्हा आम्हाला द्या म्हणून जोर लावत आहे. त्यांचेही इच्छुक कमी नाहीत. अ‍ॅड. शिवाजी माने, डॉ.जयदीप देशमुख आदींचा यात समावेश आहे. भाजपानेही या जागेसाठी मुलाखती घेतल्या. सात जण इच्छुकांच्या रांगेत आहेत. कळमनुरीत शिवसेनेचे माजी आ.गजानन घुगे हे दावेदार असले तरी पक्षातच अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यात डॉ.वसंतराव देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष गोविंदराव गुट्टे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदी आहेत. त्यातच माजी खा.सुभाष वानखेडे यांचा वेगळा गट सक्रिय आहे, हे लपून राहिले नाही. वसमतमध्ये फारसे वेगळे चित्र नाही. सेनेतील वेगळा गट थेट पडद्यावरच आला आहे. माजी आ.जयप्रकाश मुंदडा यांच्यासमोर अ‍ॅड.शिवाजी जाधव यांच्या रुपाने सवतासुभा उभा केला जात आहे. पूर्वी राष्ट्रवादीकडून जाधव हे लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांचा हा नवा डाव कोणासाठी डोकेदुखी ठरेल, हे अजूनतरी कळायला मार्ग नाही. अजूनही बरेच जण कोणत्यातरी पक्षाची उमेदवारी मिळवून रिंगणात षड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत.हिंगोलीत कॉंग्रेसचे आ.गोरेगावकर यांच्याशी दोन हात करायला भाजपाकडून कोण उमेदवार राहील, याची संभ्रमावस्था आहे. तानाजी मुटकुळे हे गतवेळचे पराभूत उमेदवार प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र बाबाराव बांगर, अ‍ॅड.प्रभाकर भाकरे, प्रा.पंडितराव शिंदे, मनोज जैन, पुंजाजी गाडे, माणिकराव भिंगीकर, नव्याने कॉंग्रेसमधून प्रवेश केलेले मिलिंद यंबल यांच्यासह १३ जणांनी चुरस निर्माण केली आहे. आतातर माजी आमदार बळीराम पाटील कोटकर हेही भाजपाकडून रिंगणात उतरायचे आहे, असे म्हणू लागले. त्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव येत असल्याचेही ते सांगत आहेत. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या गाठी-भेटी घेतल्या. माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांचीही चाचपणी सुरू आहे. मनसेचे संदेश देशमुख व ओम कोटकरही नशीब आजमावण्यास उत्सूक आहेत. घोडामैदान जवळच आहे. अजूनही अनिश्चिततेचे ढग दूर झाले नसले तरी लवकरच ते दूर होणार आहेत.