शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गनिर्मित पाणलोट व्यवस्था मानवाने थांबविल्यामुळे दुष्काळ : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:01 IST

गंगापूर/ लासूर स्टेशन : निसर्गनिर्मित पाणलोट व्यवस्था मानवाने थांबविल्यामुळेच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.

गंगापूर/ लासूर स्टेशन : निसर्गनिर्मित पाणलोट व्यवस्था मानवाने थांबविल्यामुळेच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख शेतकºयांना कर्जमाफी झाली आहे. अजूनही काम सुरूच आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. शेतकºयांना जलसंधारणाच्या कामातून सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे हा अंतिम उपाय आहे. जेणेकरून तो पुन्हा कधीच कर्जबाजारी होणार नाही. यासाठी शाश्वत सिंचनाची व विजेची सोय जलसंधारणाच्या माध्यमातून केल्यानंतर कुठल्याही प्रकारची कर्जमाफी करण्याची वेळ पुन्हा आपल्यावर येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून ११० गावांत होणाºया २६२ कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारण कामाच्या शुभारंभप्रसंगी लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रशांत बंब, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, आ. अतुल सावे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.रविवारी दुपारी दोन वाजता गंगापूर तालुक्यातील रांजणगाव पोळ येथील लघु प्रकल्पामधील गाळ काढण्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. बजाज फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून करण्यात येणाºया कामातून या प्रकल्पातील दीड लाख घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. काढण्यात आलेला गाळ १२५ क्षेत्रावर पसरविला जाणार असल्याने तेथील जमिनीची सुपीकता वाढणार आहे. या कामावर एकूण ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रसामग्री कार्यरत असणार आहे.जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी यांनी प्रास्ताविकातून बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून होणाºया जलसंधारण, महिला व युवकांच्या सशक्तीकरणाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच गंगापूर तालुक्यातील ११० गावांमध्ये २६२ कोटी रुपये खर्चाची सदरील योजना राबवून घेण्यात आ. प्रशांत बंब यांचे विशेष प्रयत्न असल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले.गेल्या डिसेंबर महिन्यात महाआरोग्य शिबिरात आजाराचे निदान झालेल्या अनेक रुग्णांपैकी एक हजार रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, येत्या काही महिन्यांत उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती आ. बंब यांनी यावेळी दिली.पोलीस ठाणे, उड्डाणपूल, ब्रह्मगव्हाण योजना मंजूर करणारलासूर स्टेशनसह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व २५ हजार एकर सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच सदर योजना सुरू करणार असल्याचे सांगून, तसेच लासूर स्टेशन येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल व पोलीस ठाणे मंजूर करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, सुनील लांजेवार, पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड, उपसभापती संपत छाजेड, तहसीलदार चंद्रकांत शेळके, डॉ. बन्सीलाल बंब, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव, नारायण वाकळे, मदनलाल लोढा, दिलीप पवार, रज्जाक पठाण, रवी चव्हाण, पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे, सावळीराम थोरात, उपसरपंच नितीन कºहाळे, पांडुरंग कुकलारे, नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे, अभय राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आ. बंब यांनी केले तर आभारप्रदर्शन चंद्रशेखर त्रिपाठी यांनी केले.दरम्यान, लासूर स्टेशन येथे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार होता. परंतु कार्यक्रमाचे आयोजन बजाज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. बजाज संस्थेचे सामाजिक कार्य पाहता त्यांच्या कार्यात अडथळा नको म्हणून निषेध नोंदविण्याचा कार्यक्रम रद्द केल्याचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी सांगितले.चौकट...समाजाला होणारा फायदा आनंददायी - मधुर बजाजबजाज कंपनी व कंपनीचे कार्यालय ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी सामाजिक कार्यात आपले अग्रगण्य काम असले पाहिजे, अशी बजाज कुटुंबियांची धारणा आहे. या कामामुळे समाजाला होणारा फायदा मोठा आनंददायी आहे, असे यावेळी मधुर बजाज यांनी सांगितले.