शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

निसर्गनिर्मित पाणलोट व्यवस्था मानवाने थांबविल्यामुळे दुष्काळ : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:01 IST

गंगापूर/ लासूर स्टेशन : निसर्गनिर्मित पाणलोट व्यवस्था मानवाने थांबविल्यामुळेच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.

गंगापूर/ लासूर स्टेशन : निसर्गनिर्मित पाणलोट व्यवस्था मानवाने थांबविल्यामुळेच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख शेतकºयांना कर्जमाफी झाली आहे. अजूनही काम सुरूच आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. शेतकºयांना जलसंधारणाच्या कामातून सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे हा अंतिम उपाय आहे. जेणेकरून तो पुन्हा कधीच कर्जबाजारी होणार नाही. यासाठी शाश्वत सिंचनाची व विजेची सोय जलसंधारणाच्या माध्यमातून केल्यानंतर कुठल्याही प्रकारची कर्जमाफी करण्याची वेळ पुन्हा आपल्यावर येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून ११० गावांत होणाºया २६२ कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारण कामाच्या शुभारंभप्रसंगी लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रशांत बंब, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, आ. अतुल सावे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.रविवारी दुपारी दोन वाजता गंगापूर तालुक्यातील रांजणगाव पोळ येथील लघु प्रकल्पामधील गाळ काढण्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. बजाज फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून करण्यात येणाºया कामातून या प्रकल्पातील दीड लाख घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. काढण्यात आलेला गाळ १२५ क्षेत्रावर पसरविला जाणार असल्याने तेथील जमिनीची सुपीकता वाढणार आहे. या कामावर एकूण ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रसामग्री कार्यरत असणार आहे.जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी यांनी प्रास्ताविकातून बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून होणाºया जलसंधारण, महिला व युवकांच्या सशक्तीकरणाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच गंगापूर तालुक्यातील ११० गावांमध्ये २६२ कोटी रुपये खर्चाची सदरील योजना राबवून घेण्यात आ. प्रशांत बंब यांचे विशेष प्रयत्न असल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले.गेल्या डिसेंबर महिन्यात महाआरोग्य शिबिरात आजाराचे निदान झालेल्या अनेक रुग्णांपैकी एक हजार रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, येत्या काही महिन्यांत उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती आ. बंब यांनी यावेळी दिली.पोलीस ठाणे, उड्डाणपूल, ब्रह्मगव्हाण योजना मंजूर करणारलासूर स्टेशनसह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व २५ हजार एकर सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच सदर योजना सुरू करणार असल्याचे सांगून, तसेच लासूर स्टेशन येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल व पोलीस ठाणे मंजूर करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, सुनील लांजेवार, पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड, उपसभापती संपत छाजेड, तहसीलदार चंद्रकांत शेळके, डॉ. बन्सीलाल बंब, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव, नारायण वाकळे, मदनलाल लोढा, दिलीप पवार, रज्जाक पठाण, रवी चव्हाण, पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे, सावळीराम थोरात, उपसरपंच नितीन कºहाळे, पांडुरंग कुकलारे, नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे, अभय राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आ. बंब यांनी केले तर आभारप्रदर्शन चंद्रशेखर त्रिपाठी यांनी केले.दरम्यान, लासूर स्टेशन येथे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार होता. परंतु कार्यक्रमाचे आयोजन बजाज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. बजाज संस्थेचे सामाजिक कार्य पाहता त्यांच्या कार्यात अडथळा नको म्हणून निषेध नोंदविण्याचा कार्यक्रम रद्द केल्याचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी सांगितले.चौकट...समाजाला होणारा फायदा आनंददायी - मधुर बजाजबजाज कंपनी व कंपनीचे कार्यालय ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी सामाजिक कार्यात आपले अग्रगण्य काम असले पाहिजे, अशी बजाज कुटुंबियांची धारणा आहे. या कामामुळे समाजाला होणारा फायदा मोठा आनंददायी आहे, असे यावेळी मधुर बजाज यांनी सांगितले.