शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रारूप मतदार यादीवर आक्षेपांचा पाऊस

By admin | Updated: March 19, 2017 23:26 IST

लातूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविण्यात येत आहेत.

लातूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. १४ ते १९ मार्चदरम्यान दीड हजारांवर आक्षेप नोंदविले गेले असून, मतदारांचा प्रभाग बदलल्याच्या बहुतांश तक्रारी आहेत, तर काही मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी आहेत. २० मार्चपर्यंत आक्षेप घेतले जाणार असून, २२ मार्चपर्यंत त्यावर निर्णय दिला जाणार आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर मनपाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाले. या यादीवर मतदारांचे आक्षेप घेण्यात येत आहेत. त्यानुसार १४ मार्चपासून दररोज आॅनलाईन पद्धतीने आक्षेप आले आहेत. आतापर्यंत आॅनलाईन पद्धतीने १ हजार ५१६ आक्षेप नोंदविले गेले आहेत. तर लेखी पद्धतीने केवळ २१ आक्षेप आले आहेत. मनपातील ३५ ते ४० कर्मचारी आलेले आक्षेप नोंदवून घेण्याचे काम करीत आहेत. मतदारांनी नोंदविलेल्या आक्षेपानुसार प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदार यादीतील संबंधितांचे नाव तपासले जात आहे. यापूर्वी कुठल्या प्रभागात होते आणि आता कुठल्या प्रभागात आले आहेत, याची खातरजमा या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत नाव होते, परंतु आता मनपाच्या प्रारुप मतदारयादीत नाव नाही. अशा २५ ते ३५ तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत. तर दीड हजारांपैकी बहुतांश तक्रारी प्रभाग बदलल्याच्याच आहेत. मनपात लेखी पद्धतीने तसेच आॅनलाईन पद्धतीने, शिवाय झोन कार्यालयातही आक्षेप घेण्यात येत आहेत. सोमवारी २० मार्च रोजी आक्षेप नोंदविण्याची शेवटची तारीख आहे. अखेरच्या तारखेत आक्षेपांचा पाऊसच पडत असल्याचे चित्र आहे. बहुप्रभाग रचना असल्यामुळे मोठे प्रभाग आहेत. त्यामुळे अनेक मतदारांची नावे या प्रभागातून त्या प्रभागात गेली असल्याचे आक्षेपांवरून दिसत आहे. १४ ते १९ मार्च दरम्यान या सहा दिवसांच्या कालावधीत आॅनलाईन पद्धतीने १ हजार ५१६ जणांनी आक्षेप नोंदविले आहेत. त्यावर मनपाचे कर्मचारी प्रत्यक्ष प्रभागांत जाऊन खात्री करून संबंधितांचे नाव प्रभाग बदलून घेतले जात असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारचा शेवटचा दिवस आक्षेप नोंदविण्याचा आहे.(प्रतिनिधी)