शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तरसाठीही बदलले परीक्षा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:49 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षा तीन ...

ठळक मुद्देवादग्रस्त परीक्षा केंद्रांवर एमबीएची परीक्षा : बीड येथील प्रकार; सल्लागार समितीचा प्रताप

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षा तीन दिवसांवर आल्या असताना जालना आणि बीड येथील महत्त्वाच्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्र वादग्रस्त ठिकाणी हलविण्यात आले आहेत. हा निर्णय नियमबाह्यपणे नेमलेल्या सल्लागार समितीने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या केंद्र बदलांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समजते.पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाल्या. या परीक्षेच्या एक दिवस आधीच ८ परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यात आला होता. त्या बदलातही कॉप्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वादग्रस्त केंद्रांचा समावेश होता. तो निर्णयही परीक्षा वाटपासाठी कायद्याचा भंग करून नेमलेल्या परीक्षा सल्लागार समितीने घेतल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर ३१ आॅक्टोबरपासून ३६ हजार पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात एम.कॉम. (सीबीसीएस) अभ्यासक्रमाची परीक्षा होणार होती. मात्र, या ठिकाणाहून परीक्षा केंद्र बदलून व्ही.एस.एस. महाविद्यालयात देण्यात आले. याचवेळी बीड येथील बलभीम आणि मिलिया महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. हे केंद्र बदलून वादग्रस्त आणि परीक्षेत हमखास गैरप्रकार होणाऱ्या आदित्य एमबीए महाविद्यालयात देण्यात आले. विशेष म्हणजे याठिकाणी गुंडागर्दीच्या माध्यमातून कॉपी करण्याचे प्रकार सर्रास चालतात, अशा ठिकाणी परीक्षा केंद्र बहाल करण्याची किमया परीक्षा वाटपासाठीच्या सल्लागार समितीने केली आहे.समितीची नियमबाह्य स्थापनाविद्यापीठात पदवी परीक्षांना सुरुवात होण्यापूर्वी परीक्षा मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांना कुलगुरूंनी विशेष निमंत्रित म्हणून बोलावले. या बैठकीत काही समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यात परीक्षा केंद्र वाटपासंदर्भात परीक्षा संचालकांना सल्ला देण्यासाठी समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अंभोरे यांची नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्यामध्ये अशा पद्धतीची समिती स्थापन करण्याविषयी कोठेही तरतूद नाही. यास काही अधिष्ठातांनी विरोधही दर्शविला. मात्र त्यांचे मत विचारात घेतले नाही.जालना आणि बीड येथील पदव्युत्तरच्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल केला आहे. हा बदल परीक्षा केंद्र वाटप सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार केला. आदित्य एमबीए हे केंद्र वादग्रस्त असल्याची माहिती नाही.- डॉ. जयश्री सूर्यवंशी, परीक्षा संचालक

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठ