शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तरसाठीही बदलले परीक्षा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:49 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षा तीन ...

ठळक मुद्देवादग्रस्त परीक्षा केंद्रांवर एमबीएची परीक्षा : बीड येथील प्रकार; सल्लागार समितीचा प्रताप

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षा तीन दिवसांवर आल्या असताना जालना आणि बीड येथील महत्त्वाच्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्र वादग्रस्त ठिकाणी हलविण्यात आले आहेत. हा निर्णय नियमबाह्यपणे नेमलेल्या सल्लागार समितीने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या केंद्र बदलांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समजते.पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाल्या. या परीक्षेच्या एक दिवस आधीच ८ परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यात आला होता. त्या बदलातही कॉप्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वादग्रस्त केंद्रांचा समावेश होता. तो निर्णयही परीक्षा वाटपासाठी कायद्याचा भंग करून नेमलेल्या परीक्षा सल्लागार समितीने घेतल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर ३१ आॅक्टोबरपासून ३६ हजार पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात एम.कॉम. (सीबीसीएस) अभ्यासक्रमाची परीक्षा होणार होती. मात्र, या ठिकाणाहून परीक्षा केंद्र बदलून व्ही.एस.एस. महाविद्यालयात देण्यात आले. याचवेळी बीड येथील बलभीम आणि मिलिया महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. हे केंद्र बदलून वादग्रस्त आणि परीक्षेत हमखास गैरप्रकार होणाऱ्या आदित्य एमबीए महाविद्यालयात देण्यात आले. विशेष म्हणजे याठिकाणी गुंडागर्दीच्या माध्यमातून कॉपी करण्याचे प्रकार सर्रास चालतात, अशा ठिकाणी परीक्षा केंद्र बहाल करण्याची किमया परीक्षा वाटपासाठीच्या सल्लागार समितीने केली आहे.समितीची नियमबाह्य स्थापनाविद्यापीठात पदवी परीक्षांना सुरुवात होण्यापूर्वी परीक्षा मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांना कुलगुरूंनी विशेष निमंत्रित म्हणून बोलावले. या बैठकीत काही समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यात परीक्षा केंद्र वाटपासंदर्भात परीक्षा संचालकांना सल्ला देण्यासाठी समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अंभोरे यांची नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्यामध्ये अशा पद्धतीची समिती स्थापन करण्याविषयी कोठेही तरतूद नाही. यास काही अधिष्ठातांनी विरोधही दर्शविला. मात्र त्यांचे मत विचारात घेतले नाही.जालना आणि बीड येथील पदव्युत्तरच्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल केला आहे. हा बदल परीक्षा केंद्र वाटप सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार केला. आदित्य एमबीए हे केंद्र वादग्रस्त असल्याची माहिती नाही.- डॉ. जयश्री सूर्यवंशी, परीक्षा संचालक

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठ