शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पंतप्रधान आवास योजनेत लवकरच डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल म्हणून २०१५ मध्ये घरकुल योजना जाहीर केली. औरंगाबाद शहरातील तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. मागील दीड वर्षांपासून लाभार्थी योजनेचे काय झाले, यासाठी मनपाकडे टक लावून बघत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल म्हणून २०१५ मध्ये घरकुल योजना जाहीर केली. औरंगाबाद शहरातील तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. मागील दीड वर्षांपासून लाभार्थी योजनेचे काय झाले, यासाठी मनपाकडे टक लावून बघत आहेत. मनपा प्रशासनाने योजना राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच हा आराखडा राज्य शासनामार्फत केंद्राकडे पाठविण्यात येईल. डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी सांगितले.देशातील प्रत्येक नागरिकाकडे २०२२ पर्यंत स्वत:चे पक्के घर असावे, या हेतूने प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. या योजनेत लाभार्थींना २ ते २.५० लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचीमध्ये चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यात नोटीफाईड झोपडपट्ट्यांचा आहे तिथेच पुनर्विकास करणे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरांची निर्मिती, खासगी, भागीदारीद्वारे घरांची निर्मिती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान आदींचा समावेश आहे. औरंगाबाद शहरात योजना राबविण्याचे दायित्व महापालिकेवर सोपविण्यात आले आहे. महापालिका सत्ताधाºयांनी मोठा गाजावाजा करून योजनेचे उद्घाटन केले. सर्वसामान्य गरीब नागरिकांनी घर मिळेल या आशेवर आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. अर्ज करण्यासाठी नागरिकांनी हजारो रुपये खर्च केले. महापालिकेकडे तब्बल ७० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले.