शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला तर ॲप डाऊनलोड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:04 IST

(डमी - ९६७) औरंगाबाद : कोराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बेरोजगारीचे प्रमाण बरेच वाढले आहे. पैसे उकळण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या ...

(डमी - ९६७)

औरंगाबाद : कोराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बेरोजगारीचे प्रमाण बरेच वाढले आहे. पैसे उकळण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढत आहेत. सर्वसामान्य नागरिक या अफलातून ऑफर्सला बळी पडत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. शहरातील सायबर पोलिसांकडे दररोज दोन ते चार नागरिक तक्रार घेऊन येत आहेत. देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात बसून सायबरचा हा भयानक खेळ खेळणाऱ्यांपर्यंत पोलीस पुरावे नसल्यामुळे पोहचू शकत नाहीत. कमी टक्क्यांमध्ये कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ऑफर्स आल्या तर त्यांचे ॲप डाऊनलोड करू नका, असे आवाहनही पोलिसांनी केले.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकही आर्थिकरित्या संकटात सापडले आहेत. फावल्या वेळेत अनेकजण सर्चिंग करीत असतात. कमी टक्क्यांमध्ये कर्ज देण्याचे आमिष दाखवून लुबाडण्याचे प्रमाण वाढतच आहे.

ॲप डाऊनलोड करताच बँकेतून रक्कम गायब

सायबर हॅकर्स अत्यंत चाणाक्ष असतात. दररोज गरजवंत ते शोधत असतात. त्यांचा ॲप डाऊनलोड करताच संबंधिताच्या बँकेतील सर्व रक्कम आपोआप गायब होते. मोबाईलवर पैसे गेल्याचा जेव्हा मेसेज येतो तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. फसवणूक झालेले ९९ टक्के नागरिक हॅकर्सचा ॲप खरा किंवा खोटा याची साधी शहानिशाही कुठे करीत नाहीत.

या आमिषांपासून सावधान

केंद्र, राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावावर पैसे देण्याचे आमिष.

आमच्या कंपनीने तुमची भाग्यवान विजेते म्हणून निवड केली आहे, तुम्हाला एवढेच करायचे आहे, म्हणून आपल्या मायाजालामध्ये ओढतात.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक पोस्ट टाकण्यात येते. त्याची लिंक क्लिक केली तर गुन्हेगारांचे फावते.

यांच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा फसू शकता

केस-१- केंद्र शासनाकडून बेरोजगार भत्ता देण्यात येत असल्याची पोस्ट पाहून लिंकमध्ये गेलो. त्यांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या तसे करीत गेलो. त्यानंतर बँकेत होते नव्हते सर्व पैसे गायब झाले.

केस-२- तुमचे बँक खाते बंद होणार आहे, एटीएमही बंद पडेल. तुमचा एटीएमचा क्रमांक आणि पासवर्ड लवकर द्या म्हणून फोन आला. पासवर्ड देताच पैसे गायब झाले.

ही घ्या काळजी

सोशल मीडियावर झटपट पैसे मिळवून देणाऱ्या भूलथापांना बळी पडू नका.

कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी दहा ठिकाणी खातरजमा करूनच निर्णय घ्या.

अनोळखी व्यक्तीला आपली, बँकेची कोणतीही माहिती अजिबात देऊ नका.

सायबर अधिकाऱ्यांचे मत

सोशल मीडिया, मोबाईलवर अधूनमधून अशा पद्धतीचे मेसेज येतात. विनाकारण त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. शंका आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. सावधगिरी बाळगलेली कधीही उत्तम असते.

गीता बागवडे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल .