शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दिवाळीत रेशनवरील डाळ , साखर मिळण्यास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:24 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांवर दिवाळीसाठीची डाळ व साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या स्वस्त दुकानांपर्यंत हा माल पोहोचला त्यांनी वाटपही सुरू केले आहे.

ठळक मुद्दे दोन दिवसांपूर्वी आला माल: पूर्वी मिळायचे तूप, रवा, मैदा व हरभऱ्याची डाळ

औरंगाबाद : गेल्या दोन-तीन दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांवर दिवाळीसाठीची डाळ व साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या स्वस्त दुकानांपर्यंत हा माल पोहोचला त्यांनी वाटपही सुरू केले आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच जर अंत्योदय व प्राधान्य कु टुंब योजनेंतर्गत तुरीची डाळ व साखर वितरित केली गेली असती, तर गरिबांची ही दिवाळी अधिकच आनंदात साजरी झाली असती.सध्या स्वस्त धान्य दुकानांमधून नियमितपणे गहू व तांदळाशिवाय काहीच मिळत नाही. रॉकेलसुद्धा मिळत नाही. दिवाळीसाठी म्हणून सरकारने तुरीची एक किलो डाळ, एक किलो साखर उपलब्ध करून देण्याचे ठरविले. मिठाचे वाटप मात्र आधीच झाले. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत तुरीची डाळ एक किलो ३५ रुपये या भावाने आणि एक किलो साखर २० रुपये या भावाने देण्यात येत आहे.पूर्वी स्वस्त धान्य दुकानांमधून पाम आॅईल, तूप, रवा, मैदा, हरभºयाची डाळ अशा तेरा वस्तू उपलब्ध करून दिल्या जात होत्या. यापूर्वीच्या सरकारमध्ये हे घडत होते; परंतु आता सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे.औरंगाबाद जिल्ह्यात १८५० स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यात १९९ दुकाने औरंगाबाद शहरातील आहेत. या दुकानांमधून सध्याही गरिबांना डाळ आणि साखर वितरित केली जात आहे. या दुकानांमध्ये ई-पॉज मशिन्स बसवण्यात आल्या आहेत.यासंदर्भात बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी सांगितले, दिवाळीनिमित्त मिठाचे वाटप पूर्वीच झाले आहे. डाळ आणि साखरेचे वाटप सुरू आहे. कुठेही गडबड नाही. वितरणात सुरळीतता आहे.स्वस्त धान्य दुकानदारांचे नेते डी.एन. पाटील यांच्या म्हणण्यानुसार जसजसा माल उपलब्ध होतोय तसे त्याचे वाटप दुकानदार करीत आहेत. हे वाटप गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. थोडेसे आधीच झाले असते तर बरे झाले असते.डीबीटीला विरोध...२९ सप्टेंबर २०१८ रोजी रोख लाभ हस्तांतरणाच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. याअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या पसंतीनुसार रोख धान्य अथवा रोख रक्कम देण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. तसेच परवानाधारकांनाही कमिशन देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे; पण देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांचा या योजनेला विरोध असून, त्याविरुद्ध आंदोलनाचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022District Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबाद