शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री ग्रामसभांना चाप; आता ग्रामसभांचे होणार व्हिडीओ-ऑडिओ रेकॉर्डिंग

By विजय सरवदे | Updated: August 11, 2023 15:36 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी

- विजय सरवदेछत्रपती संभाजीनगर : सावधान ! आता कागदोपत्री ग्रामसभा दाखवून सरपंच, उपसरंपच, ग्रामसेवकांना बनवेगिरी करता येणार नाही. यापुढे ग्रामसभेचे व्हिडीओ- ऑडिओ रेकॉर्डिंग करून ते ‘जीएस निर्णय ॲप’वर अपलोड करावे लागणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी १५ ऑगस्टपर्यंत हे ॲप कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, लवकरात लवकर लॉगिनचे काम पूर्ण करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. जिल्ह्यात ८६१ ग्रामपंचायती असून, यापैकी अनेक ठिकाणी नियमित ग्रामसभा घेऊन सामूहिक निर्णय घेतले जातात.

ग्रामपंचायत ही गावचा कारभार पाहणारी स्वायत्त संस्था आहे. ग्रामसभेत सर्व गावकऱ्यांचा सहभाग अपेक्षित असतो. मात्र, सरपंच, उपसरंपच तसेच सचिव असलेले ग्रामसेवकांकडून अनेकदा मर्जीतल्या दोन-चार सदस्यांच्या संगनमताने निर्णय घेऊन व तो ग्रामसभेचा निर्णय म्हणून लादण्याचा प्रकार करत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. याला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सर्व ग्रामपंचायतींना हे ॲप अनिवार्य केले असून, त्यावर २ ते १५ मिनिटांचा ग्रामसभेचा व्हिडीओ तसेच या सभेत घेतलेल्या निर्णयाचा सारांश ऑडिओ अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ॲपमध्ये लॉगिन करण्यासाठी ग्रामपंचायतींना ई-ग्रामस्वराज पोर्टलसाठी वापरला जाणारा यूजर आयडी व पासवर्ड वापरावा लागणार आहे.

‘जीएस निर्णय ॲप’ हे व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टलशी जोडलेले आहे. त्यामुळे ग्रामसभांचे वेळापत्रक या पोर्टलवर भरणे बंधकारक राहाणार आहे. ग्रामपंचायतींनी अपलोड केलेला व्हिडीओ अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांना असणार आहे. अपलोड केलेल्या व्हिडीओंचा तिमाही अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे.

गावांच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णयग्रामसभांमध्ये सर्व गावकऱ्यांचा सहभाग आणि बहुमताने निर्णय घेणे अपेक्षित आहे. आता ‘जीएस निर्णय ॲप’च्या माध्यमातून ग्रामसभांची खातरजमा केली जाईल. शासनाचा हा निर्णय गावच्या विकासासाठी फायद्याचा राहील. १५ ऑगस्टपासून आपल्या जिल्ह्यात हा प्रयोग सुरू करण्याची तयारी असून, सर्व संबंधितांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.- विकास मीना, ‘सीईओ’, जिल्हा परिषद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत