शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

दरोडे, वाटमाऱ्यांचे ‘आॅल आऊट’ कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 23:49 IST

बीड कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अधीक्षक जी. श्रीधर यांनी ‘आॅल आऊट आॅपरेशन’चा धडाका लावला आहे.

संजय तिपाले  बीडकायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अधीक्षक जी. श्रीधर यांनी ‘आॅल आऊट आॅपरेशन’चा धडाका लावला आहे. मात्र, दुसरीकडे घरफोड्या, दरोडे, वाटमाऱ्या व मंगळसूत्र चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. तपास रखडलेलेच असून पोलीस यंत्रणा हतबल असल्याचे चित्र आहे. लूटमारीसारख्या गंभीर गुन्ह्यांचे ‘आॅल आऊट’ कधी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.मागील अडीच महिन्यांत जिल्ह्यात २८ चोऱ्या, १० घरफोड्या, एक वाटमारी, चेनचोरी व दरोड्याचे प्रत्येकी दोन गुन्हे घडल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. दिवसा घरफोड्या, लूटमार करुन गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर व गंगावाडी येथे शेतवस्त्यांवर धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी मारहाण करुन ऐवज पळविला. पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटात दीपक टवाणी या व्यापाऱ्याला वाहन अडवून पिस्तूलच्या धाकावर तीन लाखास लुटले. बीडमध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत सलग दोन दिवस गंठनचोरीच्या घटना घडल्या. तपासासाठी अधीक्षक जी. श्रीधर यांनी पथके नेमली; परंतु ती रिकाम्या हाती परतली आहेत. अधीक्षकपदी रूजू झाल्यापासून जी. श्रीधर यांनी ‘आॅल आऊट आॅपरेशन’ ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून अचानक संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरवून वाहनांची तपासणी केली जाते. शिवाय गुन्हेगारांचीही झाडाझडती घेतली जाते. या माध्यमातून कायदा- सुव्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, गंभीर गुन्ह्यांच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नसून, चोर, दरोडेखोर मोकाट आहेत. लागोपाठ होणाऱ्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्य धास्तावले आहेत.