शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

दरोडे, वाटमाऱ्यांचे ‘आॅल आऊट’ कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 23:49 IST

बीड कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अधीक्षक जी. श्रीधर यांनी ‘आॅल आऊट आॅपरेशन’चा धडाका लावला आहे.

संजय तिपाले  बीडकायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अधीक्षक जी. श्रीधर यांनी ‘आॅल आऊट आॅपरेशन’चा धडाका लावला आहे. मात्र, दुसरीकडे घरफोड्या, दरोडे, वाटमाऱ्या व मंगळसूत्र चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. तपास रखडलेलेच असून पोलीस यंत्रणा हतबल असल्याचे चित्र आहे. लूटमारीसारख्या गंभीर गुन्ह्यांचे ‘आॅल आऊट’ कधी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.मागील अडीच महिन्यांत जिल्ह्यात २८ चोऱ्या, १० घरफोड्या, एक वाटमारी, चेनचोरी व दरोड्याचे प्रत्येकी दोन गुन्हे घडल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. दिवसा घरफोड्या, लूटमार करुन गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर व गंगावाडी येथे शेतवस्त्यांवर धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी मारहाण करुन ऐवज पळविला. पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटात दीपक टवाणी या व्यापाऱ्याला वाहन अडवून पिस्तूलच्या धाकावर तीन लाखास लुटले. बीडमध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत सलग दोन दिवस गंठनचोरीच्या घटना घडल्या. तपासासाठी अधीक्षक जी. श्रीधर यांनी पथके नेमली; परंतु ती रिकाम्या हाती परतली आहेत. अधीक्षकपदी रूजू झाल्यापासून जी. श्रीधर यांनी ‘आॅल आऊट आॅपरेशन’ ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून अचानक संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरवून वाहनांची तपासणी केली जाते. शिवाय गुन्हेगारांचीही झाडाझडती घेतली जाते. या माध्यमातून कायदा- सुव्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, गंभीर गुन्ह्यांच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नसून, चोर, दरोडेखोर मोकाट आहेत. लागोपाठ होणाऱ्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्य धास्तावले आहेत.