शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

लोककलांना शास्त्रीय चौकटीत बांधू नका; महागामीतील चर्चासत्रांत अभ्यासकांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:17 IST

या देशातील लोककला व कलावंतांना शास्त्राच्या चौकटीत बंदिस्त न करता त्यांना प्रोत्साहन द्यावे. लोकसंगीत म्हणजे गावठी संगीत नव्हे, खरे तर पारंपरिक बाबी जीवापाड जपल्यात. या देशात शास्त्र आणि परंपरा सोबतच सुरू झाल्या आहेत, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठातील डॉ. सुनिरा कासलीवाल यांनी केले.

- मल्हारीकांत देशमुख

औरंगाबाद : या देशातील लोककला व कलावंतांना शास्त्राच्या चौकटीत बंदिस्त न करता त्यांना प्रोत्साहन द्यावे. लोकसंगीत म्हणजे गावठी संगीत नव्हे, खरे तर पारंपरिक बाबी जीवापाड जपल्यात. या देशात शास्त्र आणि परंपरा सोबतच सुरू झाल्या आहेत, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठातील डॉ. सुनिरा कासलीवाल यांनी केले.

महागामीच्या शारंगदेव महोत्सवातील रविवारचे चर्चासत्र त्यांनी गुंफले. राजस्थानी लोककलेविषयी त्या म्हणाल्या की, ७०० वर्षांपासूनचे रावणहत्ता हे वाद्य येथील भोपी (भिल्ल) जमातीचे लोक वाजवतात. हे वाद्य ते स्वत: तयार करतात. त्याचे वादन करीत गातात व नृत्यही करतात. ही गोष्ट अभावानेच पाहावयास मिळते. आम्ही अज्ञजणांच्या प्रस्तुतीकरणात गाणारा वेगळा, वाजवणारा दुसरा, तर नृत्य करणारा तिसरा असतो. आम्ही आमचे वाद्य तयार करू शकत नाही. मग खरे निष्ठावान कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आज चित्रपटात राजस्थानी संगीतावर आधारित गीते येत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. आमच्या प्रदेशातील संगीतकारांना यानिमित्ताने संधी मिळते आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी सांगितले.

सुगनाराम अन् रावणहत्तासुगनाराम भोपा हा राजस्थानातील जोधपूरनजीक बाकाराशनी गावचा भिल्ल जमातीतील कलावंत. रावणहत्ता वादकाच्या घराण्यातला १७ व्या पिढीचा कलावंत, ज्याने या चर्चासत्रात आपल्या चौफेर व्यक्तित्वाचा परिचय करून दिला. रावणहत्ता वाद्याचा इतिहास सांगताना ‘पाबुजी महाराज’ या लोकदेवतेला प्रसन्न करण्यासाठी हे वाद्य वादन केले जाते. रावणाने तयार केलेले हे वाद्य आमची ओळख आहे. हे केवळ आम्हीच तयार करतो, असे सांगताना त्यांनी स्टेजवर रावणहत्ता स्वत:च्या हाताने पूर्णत: उखळून पुन्हा नव्याने तयार करून दाखविला. त्यानंतर सुगनाराम कोष्टीवाल यांनी राजस्थानी भाषेतील लोकगीतांचा नजराणा बहाल केला. आम्ही सगळे रावणाचे शिष्य असलो तरी आमच्या प्रत्येकाच्या नावामागे आम्ही ‘राम’ हा शब्द लावतो, असे ते म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मौखिक परंपरेचा आदर करा -डॉ. इंद्रायणी चक्रवर्तीशिक्षित लोकांनी परंपरेला तिलांजली दिली असली तरी ग्रामीण अर्धशिक्षित लोकांनी परंपरा चालविल्या, वाढविल्या आहेत. आपल्या कलेतील कुठलेही व्याकरण त्यांना अवगत नसले तरी केवळ मौखिक परंपरेतून त्यांनी त्याचे जतन केले आहे. आपण त्यांचे सदैव ऋणी राहावे, असे प्रतिपादन वाद्य संगीताच्या अभ्यासिका कोलकाता येथील डॉ. इंद्रायणी चक्रवर्ती यांनी केले. तंतुवाद्यात मास्टरी असणार्‍या डॉ. चक्रवर्ती यांनी ‘किन्नरीवादनशैली’ या विषयावरील त्यांच्या प्रबंधाचे वाचन करीत श्रोत्यांशी संवाद साधला.

वैदिक वाङ्मयात वारंवार उल्लेख होणार्‍या किन्नरीवाद्याला फार मोठी परंपरा असून, ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथात शारंगदेवांनी किन्नरीचे विविध प्रकार व वादनशैलीची चर्चा केली आहे. सबंध आशिया खंडात हे वाद्य प्रचलित आहे. आजघडीला तेलंगणा व कर्नाटकातील ग्रामीण भागात लोककलावंत अतिशय निष्ठेने त्याची जपवणूक करतात. वेगवेगळ्या प्रांतानुरूप भाषा बदलत असली तरी वादनशैली तीच आहे. किन्नरवादक महाभारताच्या कथा लावतात. धनुर्धर अर्जुन या वाद्याचा उद्गाता समजण्यात येतो, असे त्या म्हणाल्या. कर्नाटकात भाडिया जमातीने या वाद्याला जपले. मातंग मुनीचे हे माडिया वंशज आहेत. रामायणकालीन शबरी या जमातीची होती. मातंग किन्नडी व जोगी किन्नडी लोक या वाद्याचे पाईक असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :musicसंगीतAurangabadऔरंगाबादmgm campusएमजीएम परिसर