शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पोकळ आश्वासने नको, दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड तीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळाने आमचे जगण्याचे गणित बिघडले आहे. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी ४० किलो मीटरवरून आणावे लागते.

व्यंकटेश वैष्णव , बीडतीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळाने आमचे जगण्याचे गणित बिघडले आहे. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी ४० किलो मीटरवरून आणावे लागते. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हातउसणे घेतलेले पैसे परत द्यायचे कसे? असा प्रश्न आहे. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. ‘एवढी भयावह परिस्थिती असतानाही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होत नाही, यामुळे आमचा दुष्काळी दौऱ्यांवर येणाऱ्या पथकांवरचा विश्वासच उडालायं’ अशा तीव्र शब्दात शेतकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी अजून माणसं मरायची वाट पहाताय काय? असा सवालही यावेळी चौसाळ्याच्या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाची गाडी अडवून विचारल्याने पथकातील अधिकाऱ्यांची गोची झाली.दुष्काळाने होरपळलेल्या खरीप पिकांची पहाणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पथकात केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंघ, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, कृषी अधीक्षक रमेश भताने, डॉ. विकास सुर्यवंशी यांच्यासह गेवराई तहसीलदार चंद्रकांत सूर्यवंशी यांची पथकात उपस्थिती होती. चौसाळा परिसरातील पाच ते सहा गावच्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये सयाजी शिंदे, निलेश गुंजाळ, बाबूराव नाईकवाडे, यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.