शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

शेतकऱ्यांवर अडत लादू नये

By admin | Updated: December 27, 2014 00:48 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद औरंगाबाद : देशातील अन्य राज्यांत शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाते. मात्र, महाराष्ट्रच असे राज्य आहे की, जिथे शेतकऱ्यांकडून अडत घेतली जाते.

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद

औरंगाबाद : देशातील अन्य राज्यांत शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाते. मात्र, महाराष्ट्रच असे राज्य आहे की, जिथे शेतकऱ्यांकडून अडत घेतली जाते. मुळात अडत कोणाकडून घ्यावी, यासंदर्भात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात स्पष्टता नाही. परिणामी वर्षानुवर्षे शेतकऱ्यांकडूनच अडत घेतली जात आहे. कृषी उत्पादन व विक्री यासंदर्भात कायद्यात व्यापक प्रमाणात सुधारणा करावी, प्रत्येक नियमाचे स्पष्ट निर्देश असावेत व अडत शेतकऱ्यांवर लादू नये, असा सूर लोकमतच्या वतीने आयोजित चर्चासत्रातून निघाला. या चर्चासत्रात शेतकरी, अडत व्यापारी, लोकप्रतिनिधी, शेतीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ यांनी आपले विचार मांडले. पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी ‘अडत्याने शेतकऱ्यांकडून अडत न घेता खरेदीदारांकडून वसूल करावी’ असा आदेश काढला आणि राज्यात हा मुद्दा मागील आठवडाभर गाजला. या आदेशाच्या विरोधात राज्यातील ७० हजार अडत्यांनी संप पुकारला. अडत्यांची एकजूट पाहून सरकारने त्वरित आपला आदेश तात्पुरता मागे घेतला. ‘अडत’ या मुद्यावर लोकमतने गुरुवारी चर्चासत्र घडवून आणले. यात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी, अडत, खरेदीदार, शेतीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रारंभी डॉ.सुभाष माने यांनी ‘शेतकऱ्यांकडून अडत घेऊ नये’ हा आदेश काढला होता. त्याचे सर्वांनी स्वागत केले. राज्यभरात अडत व्यापारी या निर्णयाच्या विरोधात असले तरी जाधववाडीतील अडत व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, अडत शेतकऱ्यांऐवजी कोणाकडून घ्यावी, याचा स्पष्ट उल्लेख आदेशात केला नाही, याकडेही अडत्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शेतकरी व व्यापाऱ्यांना जोडणारा अडत्या हा धागा आहे आणि सध्याची विक्री पद्धतीही सक्षम असून, फक्त आपल्यासोबत ‘शेतकऱ्यां’चे हित साधले जावे ही मानसिकता प्रतिनिधी, अडते, व्यापाऱ्यांनी आपल्यात रुजवावी, असाही सल्ला शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्याकडून अडत्याने अडत वसूल करू नये, तर खरेदीदाराकडूनच अडत वसूल करावी. हमीभावापेक्षा बाजारात कमी दर मिळत असला तर सरकारने व बाजार समितीने स्वत: हमीभावात शेतीमाल खरेदी करावा. कृषी विषयक दीर्घकालीन व्यापक धोरण आखावे व कायदे, नियमात स्पष्टता आणावी, अशा सूचना शेतीतज्ज्ञांनी मांडल्या.