शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर अडत लादू नये

By admin | Updated: December 27, 2014 00:48 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद औरंगाबाद : देशातील अन्य राज्यांत शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाते. मात्र, महाराष्ट्रच असे राज्य आहे की, जिथे शेतकऱ्यांकडून अडत घेतली जाते.

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद

औरंगाबाद : देशातील अन्य राज्यांत शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाते. मात्र, महाराष्ट्रच असे राज्य आहे की, जिथे शेतकऱ्यांकडून अडत घेतली जाते. मुळात अडत कोणाकडून घ्यावी, यासंदर्भात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात स्पष्टता नाही. परिणामी वर्षानुवर्षे शेतकऱ्यांकडूनच अडत घेतली जात आहे. कृषी उत्पादन व विक्री यासंदर्भात कायद्यात व्यापक प्रमाणात सुधारणा करावी, प्रत्येक नियमाचे स्पष्ट निर्देश असावेत व अडत शेतकऱ्यांवर लादू नये, असा सूर लोकमतच्या वतीने आयोजित चर्चासत्रातून निघाला. या चर्चासत्रात शेतकरी, अडत व्यापारी, लोकप्रतिनिधी, शेतीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ यांनी आपले विचार मांडले. पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी ‘अडत्याने शेतकऱ्यांकडून अडत न घेता खरेदीदारांकडून वसूल करावी’ असा आदेश काढला आणि राज्यात हा मुद्दा मागील आठवडाभर गाजला. या आदेशाच्या विरोधात राज्यातील ७० हजार अडत्यांनी संप पुकारला. अडत्यांची एकजूट पाहून सरकारने त्वरित आपला आदेश तात्पुरता मागे घेतला. ‘अडत’ या मुद्यावर लोकमतने गुरुवारी चर्चासत्र घडवून आणले. यात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी, अडत, खरेदीदार, शेतीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रारंभी डॉ.सुभाष माने यांनी ‘शेतकऱ्यांकडून अडत घेऊ नये’ हा आदेश काढला होता. त्याचे सर्वांनी स्वागत केले. राज्यभरात अडत व्यापारी या निर्णयाच्या विरोधात असले तरी जाधववाडीतील अडत व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, अडत शेतकऱ्यांऐवजी कोणाकडून घ्यावी, याचा स्पष्ट उल्लेख आदेशात केला नाही, याकडेही अडत्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शेतकरी व व्यापाऱ्यांना जोडणारा अडत्या हा धागा आहे आणि सध्याची विक्री पद्धतीही सक्षम असून, फक्त आपल्यासोबत ‘शेतकऱ्यां’चे हित साधले जावे ही मानसिकता प्रतिनिधी, अडते, व्यापाऱ्यांनी आपल्यात रुजवावी, असाही सल्ला शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्याकडून अडत्याने अडत वसूल करू नये, तर खरेदीदाराकडूनच अडत वसूल करावी. हमीभावापेक्षा बाजारात कमी दर मिळत असला तर सरकारने व बाजार समितीने स्वत: हमीभावात शेतीमाल खरेदी करावा. कृषी विषयक दीर्घकालीन व्यापक धोरण आखावे व कायदे, नियमात स्पष्टता आणावी, अशा सूचना शेतीतज्ज्ञांनी मांडल्या.