शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या अपयशाचे जागर करणार-विखे

By admin | Updated: May 21, 2015 00:28 IST

जालना : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाही. केवळ घोषणा केल्या जात आहेत.

जालना : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाही. केवळ घोषणा केल्या जात आहेत. सरकारच्या या अपयशाचे जागर करून जनतेचा दबाव निर्माण करण्याचे काम पक्षाच्या वतीने केले जात असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यानिमित्त विविध गावांना भेटी देऊन आल्यानंतर जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. सुभाष झांबड, आ. वसंत चव्हाण, विलास औताडे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलिया, धोंडिराम राठोड, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अब्दूल समीर, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रशांत वाढेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दूल हाफिज, वसंत डोंगरे, बाबूराव कुलकर्णी, विष्णूपंत कंटुले, बद्रीनारायण ढवळे, सुभाष काटकर, सुरेश तळेकर, संदीप गोरे, संदीप कड, सुभाष मगरे, अन्वर देशमुख, रवींद्र तौर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नसून पर्यायाने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आपण बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील रोहयोअंतर्गत सुरू असलेल्या कामावरील मजुरांशी संपर्क साधला. हडप येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. एकनाथ लकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर सततच्या नापिकीमुळे त्यांचे जीवन जगणे कठीण झाल्याने त्यांनी जीवनयात्रा संपविली, असे सांगण्यात आले. मौजपुरी येथील भीषण पाणीटंचाईग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधून दुष्काळाची तीव्रता समजून घेतली. शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे सर्व बँकांचे कर्ज माफ व्हावे, शेतकऱ्यांकडील संपूर्ण वीजबिल माफ व्हावे, खरीप हंगामातील दुष्काळ अनुदानाचे वाटप अद्याप सर्व शेतकऱ्यांना मिळालेले नाही, सदरचे अनुदान त्वरीत मिळावे अशा मागण्या विखे पाटील यांनी यावेळी केल्या. त्यानंतर विरोधीपक्षनेते विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या भाषणातून युती सरकारवर कडाडून टीका केली. जिल्ह्यात शेतकऱ्यांना अद्यापही दुष्काळाचे अनुदान पूर्णपणे मिळालेले नाही. प्रशासनावर मंत्र्यांचा वचक नाही. बँकांकडून सहकार्य केले जात नाही, अशी टीकाही गोरंट्याल यांनी केली.४माजी आमदार सुरेश जेथलिया म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची भावना होती. तातडीच्या उपाययोजना करून शेतकऱ्यांचे प्रश्न दूर करण्याचे काम आघाडी सरकारने केले होते. मात्र सध्या युती सरकारला दुष्काळाचे निवारण करण्यात अपयश येत असून जिल्ह्यात प्रशासनाकडून सहकार्य नसल्याची टीका जेथलिया यांनी केली.