शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:09 IST

लोकशाहीत विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पराभवाने अजिबात खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी चंद्रकांत खैरे यांना ‘मातोश्री’वर दिला. साडेचार हजार मतांनी निसटता पराभव कसा झाला, याची अत्यंत बारकाईने त्यांनी माहिती घेतली. लवकरच औरंगाबादेत मेळावा घेणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : ‘मातोश्री’वर खैरे यांची भेट

औरंगाबाद : लोकशाहीत विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पराभवाने अजिबात खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी चंद्रकांत खैरे यांना ‘मातोश्री’वर दिला. साडेचार हजार मतांनी निसटता पराभव कसा झाला, याची अत्यंत बारकाईने त्यांनी माहिती घेतली. लवकरच औरंगाबादेत मेळावा घेणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.गुरुवारी सायंकाळीच खैरे यांच्या पराभवाची वार्ता मातोश्रीवर पोहोचली होती. त्यानंतर ताबडतोब उद्याच म्हणजे शुक्रवारी भेटीसाठी मातोश्रीवर या, असा निरोप चंद्रकांत खैरे यांना मिळाला होता. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर विकास जैन आज दुपारी १.३० वाजता मातोश्रीवर पोहोचले. प्रारंभी, उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाची कारणे समजून घेतली. पराभव जिव्हारी न लावता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा, असे सांगितले. पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. पक्षबांधणीसाठी लवकरच औरंगाबादेत विभागीय मेळावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.भाजपची भूमिकाही समजून घेतलीभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी खैरे यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने खैरे यांना पराभवास सामोरे जावे लागले. जालन्यात दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या मनधरणीसाठी उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करायला लावली होती. एकीकडे स्वत: निवडून येण्यासाठी सेनेची मदत घेतली. दुसरीकडे जावयाला सेना उमेदवाराच्या विरोधात उभे केले. भाजपचे हे राजकारणही उद्धव ठाकरे यांनी समजून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.लवकरच पक्षात फेरबदलशिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबाद शहरावर विशेष प्रेम होते. १९८८ पासून २०१९ पर्यंत खैरे यांनी कधीच पराभव बघितला नव्हता. खैरे यांना पहिल्यांदाच पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच संघटनेतही मोठ्या प्रमाणात फेरबदल करणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल