शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

छत्रपतींच्या नावाने मतांचा जोगवा मागू नका

By admin | Updated: October 7, 2014 00:12 IST

वसमत : विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी मोदी छत्रपतींच्या नावाचा वापर करत आहेत. ते योग्य नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी छत्रपतींचे नाव वापरू नका,

वसमत : विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी मोदी छत्रपतींच्या नावाचा वापर करत आहेत. ते योग्य नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी छत्रपतींचे नाव वापरू नका, तर स्वत:चे कर्तव्य व काम जनतेला सांगा, असे खडे बोल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वसमत येथील जाहीर सभेत भाजपाला सुनावले. राष्ट्रवादीचे उमेदवार आ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ येथे सोमवारी शरद पवार यांची जाहीर सभा झाली.सभेत पवार यांनी मोदी व केंद्र शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. अच्छे दिन, अच्छे दिन म्हणून मते मागितली. आता कोठे गेले अच्छे दिन, असा सवाल करत जनतेची फसवणूक झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतीमालाचे दर झपाट्याने उतरले. शेतकरी त्रस्त झाला आहे. सोयाबीन, कापूस यांचे दर घसरले. पाकिस्तान आपल्या देशात घुसून आक्रमण करतो आहे. आपले सैनिक प्राण गमावत आहेत. त्याची फिकीर पंतप्रधानांना नाही, तर ते मते मागण्यासाठी लोहा येथे येण्यास प्राधान्य देत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली. देशाच्या पंतप्रधानांना झोपेतही मीच दिसतो म्हणून ते जागोजागी माझ्या विरोधात बोलतात, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी आम्ही शून्य टक्के दराने कर्ज दिले. अन्नसुरक्षा कायदा केला. शेतीमालाला वाढीव दर कसा मिळेल यावरच लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्राचा शेतकरी वाचला पाहिजे. शेतकरी वाचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यासाठी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आ. दांडेगावकर हे विकास करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या मागे उभे रहा. अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांनी भाजपाकडून उभे राहण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. त्यांचे हे वागणं बरं नव्हे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. सभेत मार्गदर्शन करताना आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. कोणत्याही विकासाचा अनुभव व विकास काम नावावर नसतानाही मतदान मागण्यासाठी कसे येता? असा सवाल त्यांनी केला. (वार्ताहर)