शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या नावाने मतांचा जोगवा मागू नका

By admin | Updated: October 7, 2014 00:12 IST

वसमत : विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी मोदी छत्रपतींच्या नावाचा वापर करत आहेत. ते योग्य नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी छत्रपतींचे नाव वापरू नका,

वसमत : विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी मोदी छत्रपतींच्या नावाचा वापर करत आहेत. ते योग्य नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी छत्रपतींचे नाव वापरू नका, तर स्वत:चे कर्तव्य व काम जनतेला सांगा, असे खडे बोल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वसमत येथील जाहीर सभेत भाजपाला सुनावले. राष्ट्रवादीचे उमेदवार आ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ येथे सोमवारी शरद पवार यांची जाहीर सभा झाली.सभेत पवार यांनी मोदी व केंद्र शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. अच्छे दिन, अच्छे दिन म्हणून मते मागितली. आता कोठे गेले अच्छे दिन, असा सवाल करत जनतेची फसवणूक झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतीमालाचे दर झपाट्याने उतरले. शेतकरी त्रस्त झाला आहे. सोयाबीन, कापूस यांचे दर घसरले. पाकिस्तान आपल्या देशात घुसून आक्रमण करतो आहे. आपले सैनिक प्राण गमावत आहेत. त्याची फिकीर पंतप्रधानांना नाही, तर ते मते मागण्यासाठी लोहा येथे येण्यास प्राधान्य देत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली. देशाच्या पंतप्रधानांना झोपेतही मीच दिसतो म्हणून ते जागोजागी माझ्या विरोधात बोलतात, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी आम्ही शून्य टक्के दराने कर्ज दिले. अन्नसुरक्षा कायदा केला. शेतीमालाला वाढीव दर कसा मिळेल यावरच लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्राचा शेतकरी वाचला पाहिजे. शेतकरी वाचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यासाठी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आ. दांडेगावकर हे विकास करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या मागे उभे रहा. अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांनी भाजपाकडून उभे राहण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. त्यांचे हे वागणं बरं नव्हे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. सभेत मार्गदर्शन करताना आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. कोणत्याही विकासाचा अनुभव व विकास काम नावावर नसतानाही मतदान मागण्यासाठी कसे येता? असा सवाल त्यांनी केला. (वार्ताहर)