शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

जंगलांना व डोंगरांना आगी लागतात की लावतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST

उन्हाळ्यात गौताळा, पाटणादेवी, अजिंठा, सारोळा, म्हैसमाळ, सोयगाव, सातारा, देवळाई डोंगर, विद्यापीठाच्या मागचा डोंगर या भागात आगी लागत असतात. ...

उन्हाळ्यात गौताळा, पाटणादेवी, अजिंठा, सारोळा, म्हैसमाळ, सोयगाव, सातारा, देवळाई डोंगर, विद्यापीठाच्या मागचा डोंगर या भागात आगी लागत असतात. या आगी ९५ टक्के वेळा मानव निर्मित असतात, असा दावा औरंगाबादचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ.किशोर पाठक यांनी केला आहे.

दहा वेळा आगी

मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जंगल म्हणून ख्याती असलेल्या गौताळा-पाटणादेवी अभयारण्यात मागील दोन महिन्यांत छोट्या-मोठ्या दहा वेळा आगी लागल्या. या आगीत अनेक वृक्ष, झुडुपे, वनस्पती, कीटक, सस्तन प्राणी, पक्षी हे जखमी होतात, मृत पावतात. एक मोठी जैवविविधता या आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असते. उन्हाळा सुरू झाला की, जंगल परिसराच्या आसपासचे शिकारी, निसर्ग कंटक लोक मुद्दाम या आगी लावत असतात. या आगी लावण्याचे कारण म्हणजे फुकटचे लाकूड मिळविणे, जंगल विभागात शेतीसाठी अतिक्रमण करणे, मोर, तितर, घोरपड, ससे, रानडुकर व इतर सस्तन प्राण्यांच्या शिकारीसाठी आग लावली जाते, असे निरीक्षण नोंदविले गेले आहे.

विद्यापीठ परिसरातील डोंगर भागात, तसेच म्हैसमाळ, देवळाई, सातारा डोंगर रांगेत आतापर्यंत मागील चार महिन्यांत सात वेळा आगी लावल्या गेल्या. निसर्ग कंटक, शिकारी या लोकांसाठी या आगी लावणे खूप सोपे असते, परंतु निसर्गाची पुढील पंचवीस वर्षे भरून न येणारी हानी होत असते.

आग विझविण्यासाठी साधने कमी....

आग विरोधी कपडे, बूट, टोप्या, तसेच फायर बॉल्स, ड्रोन अशी हत्यारे प्रशासनाकडे नसल्याने कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतो. वनखात्याकडे आधीच अपुरे मनुष्यबळ, तसेच आग विरोधी संसाधनांचा अभाव असल्याने या आगी विझवायला खूप वेळ लागतो.

वर्षानुवर्षे या आगी लागत असताना प्रशासन मात्र ढिम्म असते. पर्यावरण, पाऊस, उत्तम वातावरण, सुबत्ता, पाणी हे सगळे या जंगलांवर अवलंबून असल्याने, ते वाचविण्यासाठी प्रशासनाने ताबडतोब पाऊल उचलणे गरजेचे आहे. वनखात्याचे स्वतःचे टँकर, आगविरोधी बंब असणे आवश्यक आहे. दुर्गम भागात अग्निशमन गाड्या आतमध्ये जाऊ शकत नाहीत, अशा वेळी लांब हाउस पाइपही कामी येऊ शकतात, त्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे.