शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जंगलांना व डोंगरांना आगी लागतात की लावतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST

उन्हाळ्यात गौताळा, पाटणादेवी, अजिंठा, सारोळा, म्हैसमाळ, सोयगाव, सातारा, देवळाई डोंगर, विद्यापीठाच्या मागचा डोंगर या भागात आगी लागत असतात. ...

उन्हाळ्यात गौताळा, पाटणादेवी, अजिंठा, सारोळा, म्हैसमाळ, सोयगाव, सातारा, देवळाई डोंगर, विद्यापीठाच्या मागचा डोंगर या भागात आगी लागत असतात. या आगी ९५ टक्के वेळा मानव निर्मित असतात, असा दावा औरंगाबादचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ.किशोर पाठक यांनी केला आहे.

दहा वेळा आगी

मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जंगल म्हणून ख्याती असलेल्या गौताळा-पाटणादेवी अभयारण्यात मागील दोन महिन्यांत छोट्या-मोठ्या दहा वेळा आगी लागल्या. या आगीत अनेक वृक्ष, झुडुपे, वनस्पती, कीटक, सस्तन प्राणी, पक्षी हे जखमी होतात, मृत पावतात. एक मोठी जैवविविधता या आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असते. उन्हाळा सुरू झाला की, जंगल परिसराच्या आसपासचे शिकारी, निसर्ग कंटक लोक मुद्दाम या आगी लावत असतात. या आगी लावण्याचे कारण म्हणजे फुकटचे लाकूड मिळविणे, जंगल विभागात शेतीसाठी अतिक्रमण करणे, मोर, तितर, घोरपड, ससे, रानडुकर व इतर सस्तन प्राण्यांच्या शिकारीसाठी आग लावली जाते, असे निरीक्षण नोंदविले गेले आहे.

विद्यापीठ परिसरातील डोंगर भागात, तसेच म्हैसमाळ, देवळाई, सातारा डोंगर रांगेत आतापर्यंत मागील चार महिन्यांत सात वेळा आगी लावल्या गेल्या. निसर्ग कंटक, शिकारी या लोकांसाठी या आगी लावणे खूप सोपे असते, परंतु निसर्गाची पुढील पंचवीस वर्षे भरून न येणारी हानी होत असते.

आग विझविण्यासाठी साधने कमी....

आग विरोधी कपडे, बूट, टोप्या, तसेच फायर बॉल्स, ड्रोन अशी हत्यारे प्रशासनाकडे नसल्याने कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतो. वनखात्याकडे आधीच अपुरे मनुष्यबळ, तसेच आग विरोधी संसाधनांचा अभाव असल्याने या आगी विझवायला खूप वेळ लागतो.

वर्षानुवर्षे या आगी लागत असताना प्रशासन मात्र ढिम्म असते. पर्यावरण, पाऊस, उत्तम वातावरण, सुबत्ता, पाणी हे सगळे या जंगलांवर अवलंबून असल्याने, ते वाचविण्यासाठी प्रशासनाने ताबडतोब पाऊल उचलणे गरजेचे आहे. वनखात्याचे स्वतःचे टँकर, आगविरोधी बंब असणे आवश्यक आहे. दुर्गम भागात अग्निशमन गाड्या आतमध्ये जाऊ शकत नाहीत, अशा वेळी लांब हाउस पाइपही कामी येऊ शकतात, त्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे.