शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आग्रा भेटीसाठी शिवाजी महाराजांचे दिल्ली दरवाजातूनच प्रयाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:13 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीसाठी दिल्लीकडे रवाना होताना औरंगाबादेतील दिल्ली दरवाजातून जाणाऱ्या मार्गाचीच निवड केली होती, अशी माहिती इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीसाठी दिल्लीकडे रवाना होताना औरंगाबादेतील दिल्ली दरवाजातून जाणाऱ्या मार्गाचीच निवड केली होती, अशी माहिती इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी यांनी दिली.औरंगाबाद शहराचे वैभव असलेल्या विभागीय आयुक्तालय, सुभेदारी विश्रामगृह, दिल्ली दरवाजा आणि सलीम अली सरोवर परिसरात औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे रविवारी (दि.८) हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. या वॉकची सुरुवात विभागीय आयुक्तालयाच्या इमारत परिसरापासून झाली. यावेळी इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी आणि डॉ. दुल्हारी कुरेशी यांनी स्थळांची माहिती दिली. विभागीय आयुक्तालयाची इमारत इतिहासात ‘आयना खाना’ नावाने ओळखले जाई. बादशहा औरंगजेबच्या निधनानंतर असिफजहाँ स्वतंत्र झाला. त्यांच्या कार्यकाळातच बारादरी परिसर बांधला गेला. सहावा निजाम महमूद अली पाशा यांनी परिसराची सजावट, सुशोभीकरणाला प्राधान्य दिले. या कालखंडातील स्थापत्यशिल्पे ही वेगळ्या शैलीतील आहेत. मोगलशाहीत मिनार मोठ्या आकाराचे बांधण्यात येत असत. मात्र आसिफजहाँने मिनार छोटे-छोटे बांधून स्थापत्य रचना बदलली. सुभेदारी गेस्ट हाऊसची निर्मिती १७२४ ते ४८ या काळात झाली. हेरिटेज वॉकचा समारोप सलीम अली सरोवर येथे झाला. येथील जैव विविधतेची माहिती चंद्रेशखर बोर्डे, स्वप्नील जोशी यांनी दिली. या हेरिटेज वॉकमध्ये मनपा आयुक्त डॉ. विनायक निपुण, त्यांच्या पत्नी, उपायुक्त मुथा, प्रदीप देशपांडे, डॉ. एजाज शेख, लतीफ शेख, डॉ. कामाजी डक सहभागी होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास