शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी

By admin | Updated: September 26, 2016 00:05 IST

उस्मानाबाद : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल ९१ प्रकल्प तुडूंब भरून सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे़

उस्मानाबाद : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल ९१ प्रकल्प तुडूंब भरून सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे़ तर ११ प्रकल्पात ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक पाहता हे प्रकल्पही लवकरच भरण्याची शक्यता आहे़ जिल्ह्यात ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला ंअसल्याने जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. परतीच्या पावसाने मागील पंधरा-वीस दिवसांपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे़ सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मागील चार-पाच वर्षापासून कोरडेठाक पडलेल्या प्रकल्पांमधील पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत होत आहे़ मागील चार-पाच दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २१६ पैकी तब्बल ९१ प्रकल्प तुडूंब भरले असून, ११ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत़ १८ प्रकल्पांध्ये ५१ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे़ तर १८ प्रकल्प २५ ते ५० टक्क्याच्या मध्ये आहेत़ ही परिस्थितीत आणि पावसाचा जोर पाहता पुढील काही दिवसात आणखी प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे़ तुडूंब भरलेल्या प्रकल्पांमध्ये भूम तालुक्यातील रामगंगा, संगमेश्वर, परंडा तालुक्यातील खासापूर, खंडेश्वर, साकत, तुळजापूर तालुक्यातील खंडाळा, उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी, बेन्नीतुरा या प्रकल्पांचा समावेश आहे़ तर लघू प्रकल्पांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील आळणी, खामसवाडी, राघुचीवाडी ल़पा़, पोहनेर, वलगूड ला़प़, वलगूड सा़त़, कौडगाव, शेकापूर, भूम तालुक्यातील बागलवाडी, कुंथलगिरी, गोरमाळा, पाथ्रूड, जांब, हिवर्डा, गिरलगाव, घुलेवाडी, डुक्करवाडी, उमाचीवाडी, जांब सा़त़, वाशी तालुक्यातील सेलू, हातोला, परंडा तालुक्यातील सोनारी, अंबी, जेजला, मुगाव, तिंत्रज, वाटेफळ या प्रकल्पांचा समावेश आहे़ तुळजापूर तालुक्यातील व्होर्टी, इटकळ, पळस निलेगाव, सिंदगाव, सलगरा मड्डी, मुरटा, हंगरगा, व्होर्टी सा़त़एक, खुदावाडी, तामलवाडी, सलगरा दिवटी, वाणेगाव, लोहगाव, नंदगाव, किलज, मुर्टा, धोत्री, जळकोट, आलीयाबाद, व्होर्टी सा़त़दोन, कसई (ना़), बंचाई, हंगरगा नळ, येडोळा, कुंभारी (कोरेवाडी), उमरगा तालुक्यातील कसमलवाडी, कोरेगाववाडी, अचलेर, कोळसूर, डिग्गी, केसरजवळगा, कुन्हाळी, अचलेर, भुसनी, गुंजोटी, कदेर, वागदरी, भिकार सांगवी, सुपतगा, पेठसांगवी, सरोडी, कालनिंबाळा, रामनगर, दगडधानोरा, कोरेगाव, बलसूर, कोराळ, एकूरगा, जेवळी सा़तक़्रमांक दोन, गुंजोटीवाडी, लोहारा तालुक्यातील धानुरी, लोहारा, जेवळी, मळेगाव हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत़ तर इतर ११ प्रकल्पही लवकरच भरतील, अशी आशा वर्तविण्यात येत आहे़ १० प्रकल्प कोरडे जिल्ह्यातील १० प्रकल्प अद्याप कोरडेठाक असून, २५ प्रकल्पात जोत्याखाली पाणी आहे़ तर ४३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे़ पडणाऱ्या पावसाची परिस्थिती पाहता या प्रकल्पातही पाण्याचा साठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ बोरीत ९० टक्के साठा तीर्थक्षेत्र तुळजापूरसह नळदुर्ग शहर व अणदूर गावाची तहान भागविणाऱ्या बोरी प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे शहरांसह गावाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे़ प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता, येत्या एक-दोन दिवसात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरू होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, नळदुर्गसह अणदूर, सराटी, वागदरी, शहापूर, चिवरी, बाभळगाव, गुजनूर आदी गावासह परिसरातील जमिनी सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)