शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

१५ आॅगस्टपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करणार

By admin | Updated: May 2, 2017 23:47 IST

लातूर : जिल्हा १५ आॅगस्टपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने प्रशासन काम करीत असल्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

लातूर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ४६ हजार शौचालयांची कामे पूर्ण झाली असून, मराठवाड्यातील पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणून देवणीला मान मिळाला आहे. संपूर्ण जिल्हा १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने प्रशासन काम करीत असल्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे सांगितले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, मनपा आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, २०१७ च्या खरीप हंगामापासून उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत पीक प्रात्यक्षिके, कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकरी प्रशिक्षण, सूक्ष्म सिंचन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचीही अंमलबजावणी सुरू असून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. पहिल्या टप्प्यात २०२ गावांची निवड करून ५ हजार ८१९ जलसंधारणाची कामे केली आहेत. लोकसहभागातून ६७ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, २१४ किलोमीटरपर्यंतचे नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे झाली आहेत. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात १७६ गावांची निवड होऊन २ हजार १३५ कामे पूर्ण केली आहेत. संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. पशुधन विकास योजनेंतर्गत ११ हजार ३३४ पशुधनाचा विमा उचलण्यात आला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या १ लाख ६३ हजार ४०८ सभासदांना १४ कोटी ९९ लाखांची व्याज सवलत देण्यात आली आहे. नियोजन समितीच्या निधीतून १३ हजार ७०० सभासदांना सुमारे २ कोटी रकमेचा लाभ दिला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)