शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

१५ आॅगस्टपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करणार

By admin | Updated: May 2, 2017 23:47 IST

लातूर : जिल्हा १५ आॅगस्टपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने प्रशासन काम करीत असल्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

लातूर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ४६ हजार शौचालयांची कामे पूर्ण झाली असून, मराठवाड्यातील पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणून देवणीला मान मिळाला आहे. संपूर्ण जिल्हा १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने प्रशासन काम करीत असल्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे सांगितले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, मनपा आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, २०१७ च्या खरीप हंगामापासून उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत पीक प्रात्यक्षिके, कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकरी प्रशिक्षण, सूक्ष्म सिंचन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचीही अंमलबजावणी सुरू असून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. पहिल्या टप्प्यात २०२ गावांची निवड करून ५ हजार ८१९ जलसंधारणाची कामे केली आहेत. लोकसहभागातून ६७ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, २१४ किलोमीटरपर्यंतचे नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे झाली आहेत. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात १७६ गावांची निवड होऊन २ हजार १३५ कामे पूर्ण केली आहेत. संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. पशुधन विकास योजनेंतर्गत ११ हजार ३३४ पशुधनाचा विमा उचलण्यात आला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या १ लाख ६३ हजार ४०८ सभासदांना १४ कोटी ९९ लाखांची व्याज सवलत देण्यात आली आहे. नियोजन समितीच्या निधीतून १३ हजार ७०० सभासदांना सुमारे २ कोटी रकमेचा लाभ दिला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)