शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

अपुऱ्या पोलिसांवर जिल्ह्याची सुरक्षा

By admin | Updated: June 17, 2016 00:16 IST

जालना : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यासाठी १७१० मंजूर पदापैकी १६३८ पोलिस कर्मचाऱ्यांवर मदार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.

जालना : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यासाठी १७१० मंजूर पदापैकी १६३८ पोलिस कर्मचाऱ्यांवर मदार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यातून पोलिसांत वाद सुध्दा होत असल्याच्या घटना काही पोलिस ठाण्यात घडत असल्याचे चित्र आहे. अद्यापही ५९ पोलिसांची गरज आहे.जिल्ह्याची लोकसंख्या १९ लाख आहे. वाढत्या लोकसंख्येनमुळे गुन्ह्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस दलात लोकसंख्येच्या मानाने पोलिसबळ कमी पडत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच एैरणीवर राहिला आहे. जिल्ह्यात शहरातील चार पोलिस ठाण्यासह १८ पोलिस ठाणे आहेत. त्यासाठी १७१० पोलिस कर्मचाऱ्यांची मंजुरी आहे. परंतु १६३८ पोलिस कर्मचारीच कर्तव्यावर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. काही कर्मचारी अनेक महिन्यांपासून विविध कारणांमुळे रजेवर असतात. त्यामुळे अतिरीक्त कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. २०१४ - २०१६ मध्ये दोनदा पोलिस भरती घेण्यात आली.त्यातून १५९ नवीन पोलिस कर्मचारी मिळाले. अद्यापही पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहे. अतिरीक्त कामाच्या कामामुळे पोलिसांना त्यांच्या कुंटुबाकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नसल्याचे चित्र आहे. अतिरीक्त कामाच्या तणावामुळे अनेकांना आजारांनी ग्रासले आहे. (प्रतिनिधी)