शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही गारपिटीचा तडाखा

By admin | Updated: April 13, 2015 00:46 IST

जालना : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक गावांना तडाखा दिला असून घरांवरील पत्रे उडून जाणे, भिंती कोसळणे यासह

जालना : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक गावांना तडाखा दिला असून घरांवरील पत्रे उडून जाणे, भिंती कोसळणे यासह मोठ्या प्रमाणावर सीडस् कांदा व फळबागांचे नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळनंतर झालेल्या या प्रकारामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत.शुक्रवारपासून जिल्ह्यावर पुन्हा आस्मानी संकट कोसळले आहे. अगोदरच पूर्वीच्या गारपिटीची मदत वेळेवर न मिळाल्याने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना रविवारी सायंकाळी गारपिटीने तडाखा दिला. जालना तालुक्यातील धारकल्याण येथे नारायण दाभाडे यांच्या शेतातील गोठ्यात बाभळीचे झाड पडल्याने एक गाय दगावली. तर बैल गंभीर जखमी झाला. या प्रकाराची माहिती कळताच तहसीलदार रेवननाथ लबडे, गटविकास अधिकारी सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नेर, खोडेपुरी, मोतीगव्हाण, निपाणी पोखरी, नसडगाव इत्यादी ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. भोकरदन तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. पारध, पारध खुर्द, राजूर, पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी, अवघडराव सावंगी, लिहा, सेलूद, हिसोडा, जळगाव सपकाळ, आन्वा, कल्याणी, करजगाव, वरूड बुद्रूक, पळसखेडा मुर्तड या गावांमध्ये सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात पिंपळगाव रेणुकाई परिसरात गारपिट झाली. यामध्ये कांदा सीडस्, फळबागा व पानमळ्यांचे मोठे नुकसान झाले. अंबड तालुक्यात मठपिंपळगाव परिसरात अवकाळी पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यातील भारज, वरूड, खामखेडा, हिवरा काबली, गोंधनखेडा, भातडी, आळंद, टेंभूर्णी परिसरात पाऊस झाला. भारज परिसरात मोठ्या प्रमाणात गारपिटी झाल्याने शेतकऱ्यांचे कांदा सीडस् व फळबागांचे मोठे नुकसान झाले. गारांचा आकार बोराएवढा होता. त्यामुळे पानमळा व पपईच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. मंठा तालुक्यात तळणी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात जयपूर, चौफुली, बेलोरा, वैद्य वडगाव, वझर सरकटे, शिवनगिरी, नळणी, गारटेकी, दहिफळ खंदारे, नळडोह, नायगाव, देवठाणा, खोडवा, उस्वद या गावांच्या परिसरात ५. ३० ते ६ च्या दरम्यान, मोठ्या प्रमाणात गारपिट झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब कोसळून ताराही तुटल्या. त्यामुळे काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. मागील दोन दिवसांपूर्वीही झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. परतूर तालुक्यातील पाटोदा माव, आष्टी, पांडेपोखरी परिसरात सायंकाळी ४ च्या सुमारास १५ मिनिटे गारांचा पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील काही घरांवरील पत्रे उडून गेली. फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ, विरेगाव, विरेगाव तांडा, राजाटाकळी, गुंज, मूर्ती या ठिकाणी दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान, गारपिट झाली. गारांमुळे टरबुजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कांदा सीडस्, डाळिंब, केळीबाग, आंबा यांचे मोठे नुकसान झाले. (प्रतिनिधी)