शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्हा गारठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:17 IST

उस्मानाबाद : शहरासह परिसरातील तापमानाचा पारा ८ अंशावर घसरल्याने कडाक्याची थंडी पडली आहे़

उस्मानाबाद : शहरासह परिसरातील तापमानाचा पारा ८ अंशावर घसरल्याने कडाक्याची थंडी पडली आहे़ वाढत्या थंडीमुळे आबालवृध्द हैराण झाले असून, सर्दी-खोकल्यासह इतर आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे़मागील तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा परतीचा पाऊस चांगला झाला आहे़ परतीच्या पावसामुळे रबीची पिके जोमात असून, वाढत्या थंडीमुळे काही पिकांना पोषक वातावरण असले तरी काही पिके धोक्यात आली आहेत़ शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा कडाका वाढला असून, ग्रामीण भागातील शेकोट्या पेटू लागल्या आहेत़ मागील तीन-चार वर्षात यंदाच्या थंडीची तीव्रता अधिक असल्याचे मत तापमान मापक कर्मचाऱ्यांनी सांगितले़ शहरासह परिसराचा पाराही चांगलाच घसरला आहे़ ५ व ६ जानेवारी रोजी पारा ९ अंशावर आला होता़ त्यानंतर ७ ते १० जानेवारी या कालावधीत किमान १० ते १२ अंशावर पारा राहिला़ त्यानंतर ११ जानेवारी रोजी ८़५, १२ जानेवारी रोजी ८ अंशावर पारा घसरल्याने थंडीचा कडाका वाढला होता़ १३ रोजी ९़९ अंश किमान तपमानाची नोंद झाली़ वाढलेल्या थंडीमुळे सर्दी-खोकल्यासह इतर आजारांनी आबालवृध्द हैराण आहेत़ शिवाय शासकीय, खासगी रूग्णालयातील विशेषत: बाल रूग्णालयातील रूग्णांची गर्दी वाढल्याचे जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे अबाल-वृध्दांना सर्दी- खोकल्यासह इतर काही आजार होत आहेत़ या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालावेत, सायंकाळी- सकाळी बाहेर फिरताना स्वेटर, मपलरचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे़