शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जिल्ह्याने ओलांडला २०० मिमीचा टप्पा

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

हिंगोली : यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा २५ मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्याने २०० मिमी सरासरीचा टप्पा ओलांडला.

हिंगोली : यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा २५ मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्याने २०० मिमी सरासरीचा टप्पा ओलांडला. गतवर्षी पोळ्याला सव्वा नऊशे मिमी पाऊस झाला होता. आज तेवढा पाऊस नसला तरी पोळ्याच्या दिवशी दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे़ १६ आॅगस्ट रोजी निघालेले मघा नक्षत्र पाऊस घेवून आले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले तरी तहान भागलेली नाही. ओलीला ओल गेली नसल्याने भरपूर पाण्याची गरज आहे. २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ५ मिमी पाऊस झाला. औंढा नागनाथ वगळता सर्व तालुक्यात पाऊस झाला होता. २० आॅगस्टला पावसाने हजेरी तेवढी लावली. २१ आॅगस्टला ५.२७ मिमी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. औंढा आणि कळमनुरी तालुक्यात अनुक्रमे १० मिमी पाऊस झाला. २२ आॅगस्ट रोजी सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यात २१ आणि ८ मिमी पाऊस झाला. पोळ्याच्या आदल्या दिवशी ५ पाऊस झाला. सोमवारी सकाळी कडक ऊन पडले होते. दुपारी जिल्हाभरात उत्साहात पोळा साजरा झाला. सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. रात्रीला तापमान घटताच दमदार पावसाचे आगमन झाले. विशेषत: जिल्हाभरात हा पाऊस होता. हिंगोली रात्री ९ वाजल्यापासून अर्धातास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर उशिरापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औंढा तालुक्यात ६१ मिमी पाऊस झाला. ५० मिमीच्या पूढे पाऊस झाल्याची पहिलीच वेळ असून आता ३०६ मिमीवर औंढ्याची सरासरी गेली. सेनगावातही २३ मिमी पाऊस झाला. पहिल्यांदा २० मिमीच्या पुढे पाऊस झाल्याने उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)