शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

सलग २८ दिवस नवा रुग्ण, मृत्यू नसेल, तेव्हा जिल्हा कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 2:30 PM

कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

ठळक मुद्देकोरोनाचे संकट अजूनही कायमच; दररोज आढळताहेत रुग्ण

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या घटत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्त होण्याकडे सुरू आहे. मात्र,  २८ दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही, एकही मृत्यू झाला नाही, तरच जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. विद्यमान स्थिती पाहता यासाठी औरंगाबादकरांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली. प्रामुख्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवरून ही विभागणी करण्यात आली. ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तो जिल्हा ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात आला, तर १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत, त्या जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये आहे, तर १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला. त्यानुसार औरंगाबाद ‘रेड झोन’मध्ये आले. तब्बल ७ महिन्यांनंतर कोरोना संसर्गात औरंगाबाद जिल्ह्याला ऑक्टोबरमध्ये मोठा दिलासा मिळाला. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ५६ टक्के रुग्ण कमी राहिले. 

जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार २११ होती. म्हणजे जिल्ह्यात एकाच वेळी एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू होते, तर ७ नोव्हेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ७१२ होती. ऑक्टोबरमध्ये जिल्ह्याची परिस्थिती बदलली आणि रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. या महिन्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली. आता केवळ एक हजार सक्रिय रुग्ण राहिले. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोरोनाचे संकट अजूनही कायमच; दररोज आढळताहेत रुग्णजिल्ह्यात २८ दिवस रुग्ण आढळू नये, एकही मृत्यू होऊ नये, तेव्हाच जिल्हा कोरोनामुक्त घोषित होऊ शकतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले; परंतु सध्याची स्थिती पाहता यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण रोज रुग्ण आढळतच आहेत. मृत्यूही होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद