शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

जिल्हाधिकाऱ्यांनीच घेतला ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांचा ‘वर्ग’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST

बीड : बीड जिल्हा परिषदेच्या पिंपळनेर येथील शाळेत आयोजित विविध उपक्रमाच्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक घेतलेल्या ‘शाळे’ने अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची तर भंबेरी उडाली

सतीश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्हा परिषदेच्या पिंपळनेर येथील शाळेत आयोजित विविध उपक्रमाच्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक घेतलेल्या ‘शाळे’ने अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची तर भंबेरी उडालीच; परंतु ग्रामस्थांनाही आपल्याच पाल्यांसमोर उघडे पाडले. एकमेकांचे उणेदुणे न काढता शासकीय योजना, उपक्रमाचा लाभ उठवीत गावच्या विकासासाठी सहकार्य करा, असा उपदेशही त्यांनी यावेळी केला.ऋषी चैतन्य आश्रम, नवी दिल्ली आणि सिद्धीविनायक सेवाभावी संस्था, पिंपळनेर (गणपती) यांच्या विद्यमाने पिंपळनेरच्या जि.प.शाळेत विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सकाळी बारा वाजता आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, सिद्धीविनायकचे डॉ. शिवप्रसाद चरखा, आश्रमचे चेतन करिया, मुंदडा, नाथाराम ननावरे, माजी सरपंच सतीश पाटील, भगवान जाधव, गणपत डोईफोडे, सुनील पाटील, किशोर सुरवसे, लोणकर, भगीरथ चरखा, गटशिक्षणाधिकारी मधुकर मोराळे आदी उपस्थित होते.ऋषी चैतन्य आश्रम, नवी दिल्ली आणि सिद्धीविनायक सेवाभावी संस्था, पिंपळनेर (गणपती) यांच्या सहकार्यातून जि.प.च्या १९ शाळांत राबवित असलेल्या इ-लर्निंग, शुद्धपेयजल, प्रयोगशाळा, ग्रंथालय, झापेवाडी येथील अद्ययावत शाळा इमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. डॉ शिवसप्रसाद चरखा यांनी प्रास्ताविकात सेवाभावी संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. नामदेव ननावरे यांनी निर्मलग्राम योजनेत सहभागी होऊन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. पत्रकार गणेश सावंत यांनी सूत्रसंचालन करताना गावातील विविध उपक्रमाची माहिती पाहुण्यांना दिली.इतरांप्रमाणेच जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचीही भाषणबाजी होईल, असे वाटत असतानाच त्यांनी प्रश्नांचा भडिमार करून अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांसह ग्रामस्थांची विकेट घेतली. वृक्षारोपणापासून ते ग्रामस्वच्छतेपर्यंत आढावा घेताना तुम्ही इतरांसाठी आदर्श बना, असा सल्ला दिला. कुणाकडे स्वच्छतागृह आहे, झाडे लावलीत का, ग्रामसभा वेळोवेळी होते का?, सातबारा आॅनलाईन झाला का इ. प्रश्न जाहीर विचारले. काही ग्रामस्थांनीही तलाठी, ग्रामसेवक गावात थांबत नाहीत, वेळेवर ग्रामसभा होत नाही, अशी तक्रार केली. प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना त्यांनी विद्यार्थ्यांनाही साधेसोपे प्रश्न विचारून त्यांची गुणवत्ता चाचणी घेतली. अनेक विद्यार्थ्यांना उत्तरे देता आली नाहीत. याचा ऊहापोह त्यांनी जाहीर कार्यक्रमात केला नाही तर पुढच्या वेळी जेव्हा मी येईल तेव्हा त्याचा आढावा घेईल, असा इशाराच शिक्षकांना दिला. प्रत्येक विद्यार्थ्याने पाच रोपे लावून ती जगवली पाहिजेत जे विद्यार्थी चांगले यात चांगले काम करतील अशा जि.प.च्या पन्नास शाळेतील विद्यार्थ्यांना माझ्या घरी चहा, फराळासाठी निमंत्रण असेल, असे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांनाही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.