जालना : कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्यासाठी प्रस्ताव मंत्रालयस्तरावर रखडलेला आहे. त्यामुळे बंधारे बांधण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून मिळालेले ८ कोटी रूपये अखर्चित आहेत. त्या पार्श्वभूमीवर बंधार्यांसदर्भात निर्णय घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतून बंधार्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी जालनेकरांनी तीव्र पाणीटंचाईला तोंड दिले. या टंचाईवर मात करण्यासाठी कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नचे आठ बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी घाणेवाडी जलसंरक्षण मंच तसेच शहरातील उद्योजक, व्यापार्यांनी पुढाकार घेऊन रामतीर्थ स्मशानभूमीजवळ बंधारा जालन्यात उभारून तो यशस्वी केला. त्याचप्रमाणे या नदीवर आणखी सात बंधारे बांधण्यात येणार आहे. या बंधार्यांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गतवर्षी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून आठ कोटी रूपयांचा उपलब्ध करून दिला. अल्पावधीतच तो निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्गही करण्यात आला. परंतु या बंधार्यांचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर रखडला असल्यामुळे निधी मिळूनही बंधार्यांची कामे प्रशासकीय मान्यतेअभावी सुरू करता आली नाहीत.मंगळवारी होणार्या बैठकीतून जिल्हाधिकारी आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत अशी अपेक्षा स्वयंसेवी संस्थांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
बंधार्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकार्यांची बैठक
By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST