शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीनेही ठेवला ठपका

By admin | Updated: March 5, 2015 00:03 IST

बीड : जिल्हा परिषदेतील बेकायदेशीर कामांच्या तक्रारीनंतर सुरु असलेले लेखापरीक्षण पूर्ण होतही नाही, तोच तत्कालीन (कॅफो) मुख्य वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांचे ‘डबलबिल’ प्रकरण बाहेर आले

बीड : जिल्हा परिषदेतील बेकायदेशीर कामांच्या तक्रारीनंतर सुरु असलेले लेखापरीक्षण पूर्ण होतही नाही, तोच तत्कालीन (कॅफो) मुख्य वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांचे ‘डबलबिल’ प्रकरण बाहेर आले. मंगळवारी रात्री जाधवर यांच्यासह मजूर संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.चिंचोली माळी (ता. केज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीचे दुबार बिल काढून जिल्हा परिषदेची दोन लाख ८६ हजार ६६० रुपयांची फसवणूक करुन अपहार केल्याची फिर्याद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शेंडे यांनी दिली. त्यावरुन तत्कालीन कॅफो जाधवर व अध्यक्ष संत ज्ञानेश्वर मजूर सहकारी संस्था, कासारी बोडखा ता. धारुर या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. या फिर्यादीने जि.प. च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. ३ आॅक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०१४ या दरम्यान तत्कालीन कॅफो वसंत जाधवर यांनी चिंचोलीमाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्तीचे दोन देयके आदा केली होती. हे धक्कादायक प्रकरण बाहेर आल्यानंतर सीईओ नामदेव ननावरे यांनी कॅफो जाधवर यांच्यासह संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे ज्या दिवशी जाधवरांना कार्यमुक्त केले, त्याच दिवशी त्यांनी बनावट देयक अदा केले. सहायक निरीक्षक मारूती शेळके म्हणाले, कागदपत्रे हस्तगत करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)जाधवर यांचे कारनामे...नंदूरबार येथून दोन वर्षांपूर्वी बीडला बदलीने आलेले कॅफो वसंत जाधवर यांचा कार्यकाळ वादग्रस्त होता. नंदूरबारमधील कार‘किर्र्दी’मध्ये केलेल्या कारनाम्यांमुळे त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरुच होता. बीडमध्येही पदाधिकारी- कर्मचाऱ्यांशी त्यांचे नेहमी खटके उडत. सतत ‘कायद्या’ची भाषा बोलणारे जाधवर फायद्याच्या नादातच कचाट्यात सापडले. २९ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांच्यावर एकतर्फी कार्यमुक्तीची नामुष्की ओढावली होती. आता ते पोलिसी चौकशीच्या फेऱ्यात आडकले आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत तत्कालीन कॅफो जाधवर यांच्यावर ठपका आहे. वित्त आयोग, झेडपीआर, दलित वस्ती विकास योजनेच्या कामांमध्ये तरतूदीपेक्षा अधिक रुपयांची देयके मंजूर करणे, वित्तीय अनियमितता करणे, रेकॉर्ड न ठेवणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.