शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढूनही कर्मचाऱ्यांची दांडी !

By admin | Updated: March 26, 2016 00:54 IST

राजकुमार जोंधळे , लातूर चालू वित्तीय वर्ष संपण्यास कांही दिवस शिल्लक असून, ३१ मार्चपूर्वी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत व इतर योजनेअंतर्गत वितरीत निधी पूर्ण खर्च करणे बंधनकारक आहे

राजकुमार जोंधळे , लातूरचालू वित्तीय वर्ष संपण्यास कांही दिवस शिल्लक असून, ३१ मार्चपूर्वी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत व इतर योजनेअंतर्गत वितरीत निधी पूर्ण खर्च करणे बंधनकारक आहे. शिवाय सध्याला राज्य मंत्रिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच गटविकास अधिकारी, सर्व खातेप्रमुख आणि विभाग प्रमुखांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेतील कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी असली तरी, २४ ते २७ मार्च या कालावधीत सुरु ठेवण्याचे ‘विशेष आदेश’ दिले आहेत. मात्र शुक्रवारी लातूर शहरातील बहुतांश कार्यालयात शुकशुकाट होता़ काही कार्यालयात तर एकही अधिकारी-कर्मचारी नसल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये आढळून आले आहे़ शुक्रवारी दुपारी १.३० पासून ‘लोकमत’ने शासकीय कार्यालयात फेरफटका मारुन आढावा घेतल्यानंतर हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष आदेशानंतरही बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच असल्याचे दिसून आले़ जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या विविध कार्यालयात सकाळपासूनच शुकशुकाट असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून पुढे आले आहे.दुपारी १. ५५ वाजता जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयात ‘लोकमत’चा चमू पोहोचला. येथे दोन कर्मचारी उपस्थित होते. तर कार्यालय प्रमुख गैरहजर असल्याने त्यांची खुर्ची रिकामीच होती. पुढे ‘लोकमत’चा कॅमेरा २.१६ वाजता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयात पोहचला. येथेही दोनच कर्मचारी उपस्थित होते. उर्वरित खुर्च्या रिकाम्याच असल्याने शुकशुकाट होता. २.२२ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयाच्या प्रवेशव्दारास चक्क टाळे होते. २.२८ वाजता कोषागार कार्यालयात चमू पोहोचला, तेथेही कर्मचारी उपलब्ध नसल्याने ८० टक्के खुर्च्या रिकाम्याच होत्या. जिल्हा सहकारी संस्था कार्यालयात एक सेवक, दोन कर्मचारी अशी संख्या आढळून आली. उर्वरित अधिकारी, कर्मचारी कार्यालयात नसल्याने रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या. २. ३५ वाजता सहायक निबंधक सहकारी संस्था लातूर कार्यालयात स्मृती पाटील यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. इतर कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच असल्याचे दिसून आले. यावेळी कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. लोकमतचा कॅमेरा बांधकाम विभाग कार्यालयात दुपारी २.४० वाजता फिरवला असता, येथेही कार्यकारी अभियंता वि. मु. चव्हाण यांची खुर्ची रिकामी होती. जिल्हा परिषदेच्या कृषी कार्यालयातील चार कर्मचारी वगळता इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्च्याही रिकाम्याच असल्याचे आढूळून आले. तर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशव्दाराला टाळे असल्याचे आढळून आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील बहुतांश कार्यालयांत तीन ते पाच कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. उर्वरित कर्मचारी गैरहजर असल्यामुळे सकाळपासूनच सर्वत्र शुकशुकाट असल्याचे ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले आहे.