शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्हा बँक ‘बॅकफुट’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 23:37 IST

उस्मानाबाद : सर्वच बाजुंनी होणाऱ्या टिकेमुळे कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात बॅन्ड वाजविण्याचा निर्णय मागे घेत जिल्हा बँक प्रशासनाने आता कर्जवसुलीसाठी सामंजस्याचा फॉर्म्युला हाती घेतला आहे़

उस्मानाबाद : सर्वच बाजुंनी होणाऱ्या टिकेमुळे कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात बॅन्ड वाजविण्याचा निर्णय मागे घेत जिल्हा बँक प्रशासनाने आता कर्जवसुलीसाठी सामंजस्याचा फॉर्म्युला हाती घेतला आहे़ मागील दोन महिन्यात जवळपास शेती, बिगर शेतीची जवळपास चार कोटी रूपयांची वसुली करण्यात बँकेला यश आले आहे़रोखे घोटाळे, विना तारण कर्जवाटप आदी विविध कारणांनी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आली आहे़ विविध प्रकारे कर्जवसुलीसाठी प्रयत्न करूनही वसुली होत नसल्याने जिल्हा बँक प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात बिगर शेती, शेतीच्या थकीत कर्जवसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीसा दिल्या होत्या़ या नोटीसीमध्ये शेतकऱ्यांच्या घरासमोर बँड लावून गांधीगिरी करीत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता़ एकीकडे दुष्काळ, कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असताना जिल्हा बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरासमोरच गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता़ या पार्श्वभूमीवर सर्वच बाजुंंनी टिका होत होती़ होणारी टिका पाहता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने गांधीगिरी आंदोलनाचा निर्णय मागे घेत शेती, बिगर शेतीच्या वसुलीसाठी सामंजस्य हा पर्याय काढून वसुली मोहीम हाती घेतली आहे़जिल्हा बँकेचे बिगर शेती संस्थेचे जवळपास २३४३ सभासद असून, यात ४६७ शेती संस्था सभासद आहेत़ उर्वरित १८७६ पैकी २१३ संस्थांना बँकेने कर्ज दिले होते़ यातील मार्च २०१६ अखेरपर्यंत बिगर शेतीचे १९८ थकीत कर्जदार होते़ या थकबाकीदारांकडे १९५ कोटी ६२ लाख रूपयांचे कर्ज थकीत होते़ यापैकी ८ संस्थांकडून नोव्हेंबर अखेरपर्यंत २४ लाख ९९ हजार कर्जाची वसुली करण्यात आली होती़ तर डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत ८ संस्थांकडून ४ लाख २० हजार रूपये अशी जवळपास २९ लाख रूपये बिगर शेतीचे कर्जवसूल करण्यात आले आहे़ १९७० शेती संस्थांकडे जवळपास ७६ कोटी ९७ लाख ७१ हजार रूपयांची थकबाकी आहे़ तर १ लाख १२ हजार कर्जदार सभासदांकडे ५८५ कोटी ३७ लाख ५३ हजार रूपयांचे कर्ज थकीत आहे़ या कर्जाच्या वसुलीसाठीही बँकेने नोटीसा दिल्या होत्या़ यातील ३ कोटी ७५ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वसूल करण्यात आले आहे़ बिगर शेतीचे केवळ २९ लाख रूपये कर्ज वसूल झाले असले तरी थकीत कर्जापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ७५ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वसूल झाले आहे़ बिगर शेतीची बहुतांश प्रकरणे विविध कारणास्तव न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबीत आहेत़ परिणामी ही कर्जवसुली थांबली आहे़ दुसरीकडे दुष्काळ, नापिकीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनीच मागील चार महिन्यात सर्वाधिक ३ कोटी ७५ लाख ३७ हजाराचे कर्ज भरले आहे़