शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

जिल्हा बँक ‘बॅकफुट’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 23:37 IST

उस्मानाबाद : सर्वच बाजुंनी होणाऱ्या टिकेमुळे कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात बॅन्ड वाजविण्याचा निर्णय मागे घेत जिल्हा बँक प्रशासनाने आता कर्जवसुलीसाठी सामंजस्याचा फॉर्म्युला हाती घेतला आहे़

उस्मानाबाद : सर्वच बाजुंनी होणाऱ्या टिकेमुळे कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात बॅन्ड वाजविण्याचा निर्णय मागे घेत जिल्हा बँक प्रशासनाने आता कर्जवसुलीसाठी सामंजस्याचा फॉर्म्युला हाती घेतला आहे़ मागील दोन महिन्यात जवळपास शेती, बिगर शेतीची जवळपास चार कोटी रूपयांची वसुली करण्यात बँकेला यश आले आहे़रोखे घोटाळे, विना तारण कर्जवाटप आदी विविध कारणांनी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आली आहे़ विविध प्रकारे कर्जवसुलीसाठी प्रयत्न करूनही वसुली होत नसल्याने जिल्हा बँक प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात बिगर शेती, शेतीच्या थकीत कर्जवसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीसा दिल्या होत्या़ या नोटीसीमध्ये शेतकऱ्यांच्या घरासमोर बँड लावून गांधीगिरी करीत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता़ एकीकडे दुष्काळ, कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असताना जिल्हा बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरासमोरच गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता़ या पार्श्वभूमीवर सर्वच बाजुंंनी टिका होत होती़ होणारी टिका पाहता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने गांधीगिरी आंदोलनाचा निर्णय मागे घेत शेती, बिगर शेतीच्या वसुलीसाठी सामंजस्य हा पर्याय काढून वसुली मोहीम हाती घेतली आहे़जिल्हा बँकेचे बिगर शेती संस्थेचे जवळपास २३४३ सभासद असून, यात ४६७ शेती संस्था सभासद आहेत़ उर्वरित १८७६ पैकी २१३ संस्थांना बँकेने कर्ज दिले होते़ यातील मार्च २०१६ अखेरपर्यंत बिगर शेतीचे १९८ थकीत कर्जदार होते़ या थकबाकीदारांकडे १९५ कोटी ६२ लाख रूपयांचे कर्ज थकीत होते़ यापैकी ८ संस्थांकडून नोव्हेंबर अखेरपर्यंत २४ लाख ९९ हजार कर्जाची वसुली करण्यात आली होती़ तर डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत ८ संस्थांकडून ४ लाख २० हजार रूपये अशी जवळपास २९ लाख रूपये बिगर शेतीचे कर्जवसूल करण्यात आले आहे़ १९७० शेती संस्थांकडे जवळपास ७६ कोटी ९७ लाख ७१ हजार रूपयांची थकबाकी आहे़ तर १ लाख १२ हजार कर्जदार सभासदांकडे ५८५ कोटी ३७ लाख ५३ हजार रूपयांचे कर्ज थकीत आहे़ या कर्जाच्या वसुलीसाठीही बँकेने नोटीसा दिल्या होत्या़ यातील ३ कोटी ७५ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वसूल करण्यात आले आहे़ बिगर शेतीचे केवळ २९ लाख रूपये कर्ज वसूल झाले असले तरी थकीत कर्जापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ७५ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वसूल झाले आहे़ बिगर शेतीची बहुतांश प्रकरणे विविध कारणास्तव न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबीत आहेत़ परिणामी ही कर्जवसुली थांबली आहे़ दुसरीकडे दुष्काळ, नापिकीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनीच मागील चार महिन्यात सर्वाधिक ३ कोटी ७५ लाख ३७ हजाराचे कर्ज भरले आहे़