शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ नुसार लोकप्रतिनिधीची अपात्रता सहा वर्षांनंतर आपोआप संपुष्टात येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:32 IST

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८ नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरविले असेल तर त्यांची अपात्रता सहा वर्षांसाठीच असते. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ नुसार एखाद्या पदाधिकाऱ्याची अपात्रता शासनाने रद्द केली नसली तरी सहा वर्षांनंतर ती आपोआप संपुष्टात येते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. सुनील कोतवाल यांनी दिला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

औरंगाबाद : लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८ नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरविले असेल तर त्यांची अपात्रता सहा वर्षांसाठीच असते. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ नुसार एखाद्या पदाधिकाऱ्याची अपात्रता शासनाने रद्द केली नसली तरी सहा वर्षांनंतर ती आपोआप संपुष्टात येते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. सुनील कोतवाल यांनी दिला आहे.खुनाच्या आरोपाखाली तब्बल २२ वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवडून आलेले बळीराम तोताराम सोनवणे यांची अपात्रता शासनाने मागे घेतली नव्हती. निवडून येताना ते अपात्रच होते, असा दावा करणाºया याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्वाळा दिला.जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवडून आलेले बळीराम तोताराम सोनवणे यांच्या निवडणुकीपूर्वी सरकारने त्यांची अपात्रता रद्द केली नव्हती. त्यामुळे निवडणूक लढविताना सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ नुसार अपात्रच होते, असा आक्षेप घेणारी याचिका जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालक शांताराम सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८ नुसार लोकप्रतिनिधीची अपात्रता सहा वर्षांसाठी असते. त्यानंतर ती आपोआप रद्द होते, याचा सर्वंकष विचार खंडपीठाने केला. शिक्षा भोगून आल्यानंतर संबंधिताला संपूर्ण जीवनभर अपात्र ठरविता येत नाही. कारण शिक्षा भोगल्यानंतर ठराविक अपात्रतेच्या काळात त्याला कायद्यानुसार सुधारण्याची संधी दिलेली असते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ मधील तरतूद ही खाजगी जीवनातील स्वतंत्रता म्हणजे राज्यघटनेच्या कलम १४ आणि २१ चा भंग करणारी आहे, असे स्पष्ट निरीक्षण खंडपीठाने नोंदविले. तसेच अपात्रता रद्द करणे किंवा न करणे ही बाब राजकारणी लोकांच्या मर्जीवर सोडता येणार नाही.म्हणून केंद्रीय कायद्यातील तरतूद, सुधारण्याची संधी, खाजगी जीवन आणि राज्यघटनेच्या कलम १३ आणि २१ चा विचार करून यापुढे कलम ४१ नुसार एखाद्याची अपात्रता सरकारने मागे घेतली नसली तरी ती सहा वर्षांनंतर आपोआप संपुष्टात येईल, असा निर्वाळा खंडपीठाने दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. एन. नागरगोजे, सोनवणे यांच्यातर्फे अ‍ॅड. भरत वर्मा आणि शासनातर्फे सहायक सरकारी वकील महेंद्र नेरलीकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबाद