शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी वाद मिटला अन् पहाटे पेटविले

By admin | Updated: April 23, 2015 00:50 IST

मधुकर सिरसट ,केज जिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी तालुक्यातील उमरी येथे घडलेली घटना तर कडेलोट ठरली. हंडाभर पाण्यासाठी एका विधवेला जीवंत पेटविले.

मधुकर सिरसट ,केजजिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी तालुक्यातील उमरी येथे घडलेली घटना तर कडेलोट ठरली. हंडाभर पाण्यासाठी एका विधवेला जीवंत पेटविले. तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. वर्षा दिना मुळे (रा. उमरी) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्यांनी २०० रुपये महिन्याने भारत वामन मुळे याच्याकडून बोअरचे पाणी घेतले होते. मात्र त्यांच्यात पाणी भरण्यावरून गुरुवारी वाद झाला. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही तर केज ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीही दाखल झाल्या. त्यानंतर वाद धुमसतच गेला. रविवारी पहाटे भारत वामन मुळे , धनराज वामन मुळे, मनीषा संपत मुळे हे तिघे वर्षा यांच्या घरावर चालून गेले. त्यांना घराबाहेर बोलावून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. जिवाच्या आकांताने वर्षा सैरावैरा धावत सुटल्या. मात्र आग विझेपर्यंत त्या ९५ टक्के भाजल्या. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.पीठ गिरणी चालवून उदरनिर्वाहवर्षा मुळे याचे पती दिना यांचा आठ वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्यांचे निधन झाले होते. वर्षा यांना दोन मुले असून गावात पीठ गिरणी चालवून त्या उदरनिर्वाह करत आहेत. तीनही आरोपी जेरबंदया प्रकरणातील आरोपी भारत मुळे, धनराज मुळे, मनीषा मुळे यांना केज पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील मनीषा हिचा गावात हॉटेलचा व्यवसाय आहे.वर्षा मुळे यांनी वर्षभरापूर्वी भारत मुळे याला ४० हजार रुपये हातउसणे दिले होते. वर्षा यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे परत करण्याची अट घातली होती. मात्र लग्नावेळी भारत याने पैसे परत केले नाहीत. दरम्यानच्या काळात वर्षा यांना मनीषा मुळे हिच्या मध्यस्थीने २०० रुपये महिन्याने भारत याने बोअरवरून पाणी देणे सुरू केले होते. नंतर त्याने पाणी देणे बंद केले. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढतच गेला. वर्षा मुळे व भारत मुळे यांचा वाद ठाण्यापर्यंत पोहंचल्यानंतर फिर्यादी दाखल झाल्या. मात्र त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी तंटामुक्ती समितीने पुढाकार घेतला. शनिवारी दुपारी तंटामुक्ती अध्यक्ष भागवत यादव, उपसरपंच बालासाहेब यादव, दत्ता चाळक यांच्या मध्यस्थीने तडजोड झाली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे वर्षा यांना पेटविले.