शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

कृउबाचे संचालक मंडळ होणार बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:23 IST

ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण आवकच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. येत्या काळात औरंगाबाद कृउबालाही राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता असून, नवीन सुधारणानुसार राष्ट्रीय दर्जा मिळणाऱ्या बाजार समितीतील लोकनियुक्त संचालक मंडळ बरखास्त केले जाईल.

ठळक मुद्देराष्ट्रीय दर्जा मिळणार : बाजार समित्यांवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ, निवडणूक बंद

औरंगाबाद : ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण आवकच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. येत्या काळात औरंगाबाद कृउबालाही राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता असून, नवीन सुधारणानुसार राष्ट्रीय दर्जा मिळणाऱ्या बाजार समितीतील लोकनियुक्त संचालक मंडळ बरखास्त केले जाईल. त्याऐवजी राज्य शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाचा ‘राज’ सुरूहोईल.शेतमाल पणन सुधारणांमधील सर्वात महत्त्वाच्या असणाºया बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देणाºया सुधारणा कायद्याला राज्यपालांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे आता पहिल्या टप्प्यात राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक,नागपूर व लातूर येथील बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार समिती म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समित्यांवर आता शासन नियुक्त २३ जणांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे. यातील मुंबई, पुणे व नागपूर या बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळे नाहीत तेथे प्रशासक आहेत. यामुळे या बाजार समितीतील संचालक मंडळ बरखास्तीचा मुद्दा उपस्थित होत नाही. औरंगाबादेतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा पहिल्या टप्प्यात समावेश नाही; पण येथे ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतीमाल मध्यप्रदेश,राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, काश्मीर, केरळ या राज्यांतून येतो. यामुळे येत्या काळात या बाजार समितीलाही राष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊ शकतो. येथील लोकनियुक्त संचालक मंडळाचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आणखी २ वर्षांचा कालावधी बाकी आहे. सध्या भाजपची सत्ता बाजार समितीवर आहे. मात्र, राष्ट्रीय दर्जा मिळाला तर संपूर्ण लोकनियुक्त संचालक मंडळ बरखास्त होईल व प्रशासकीय मंडळाच्या हाती कारभार येऊ शकतो. एवढेच नव्हे तर सहनिबंधक दर्जाच्या अधिकाºयाला बाजार समितीचे सचिवपद मिळू शकते.(जोड)हमाल-मापाड्यांवर अन्यायराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या बाजार समित्यांवर राज्य शासन प्रशासकीय मंडळ नेमणार आहे. यात समितीमधील पाच परवानाधारक व्यापारी, ८ शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. मात्र, हमाल-मापाडीच्या एका प्रतिनिधीला यातून वगळण्यात आले आहे. पूर्वी संचालक मंडळात ३ व्यापारी प्रतिनिधी असत. याविरोधात हमाल-मापाडी महामंडळ, लेबर युनियनने दीर्घकाळ आंदोलन करून ३ ऐवजी २ व्यापारी व १ हमाल-मापाडी प्रतिनिधी घेण्यास शासनाला भाग पाडले होते. राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या बाजार समित्यांमधून आता हमाल-मापाड्यांच्या प्रतिनिधीला डावलण्यात येत आहे. हा अन्याय होय. या विरोधात लवकरच आंदोलनाची दिशा ठरविली जाईल.सुभाष लोमटेसरचिटणीस, महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळ--८० टक्के आवक परपेठ, परराज्यातूनजाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र तालुक्यापुरतेच मर्यादित आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतजमीन औद्योगिक क्षेत्रात गेली आहे. परिणामी, शेतीमालाची आवक घटली. बाजार समितीत येणारा ८० टक्के शेतीमाल परजिल्ह्यातून व परराज्यातूनच येत आहे.हरिश पवारअडत व्यापारी

टॅग्स :MarketबाजारAurangabadऔरंगाबाद