शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:17 IST

किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला.

ठळक मुद्देमदनी चौैकातील घटना : आठ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांचा उद्रेक; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला. जमावाने उपकेंद्रावर दगडफेक करून तेथील सामानांची तोडफोड केली आणि कर्मचाºयांना धक्काबुक्की केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करून ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर सुमारे तासभर ठिय्या दिला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.रोशनगेट, जिन्सी, मध्यवर्ती जकात नाका आदी भागांत भारनियमनानंतरही विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचा संयम सुटला व जमावाने रोशनगेट उपकेंद्राची तोडफोड केली.सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुपारच्या सत्रातील भारनियमन बंद झाले आणि एकाच वेळी घराघरांतील विद्युत उपकरणे सुरू झाली. त्यामुळे विद्युत वाहिन्यांवर भार वाढला व मध्यवर्ती जकातनाका येथे स्मशानभूमीजवळ ३३ के.व्ही.ची वाहिनी तुटली. त्यामुळे बायजीपुरा उपकेंद्रांतर्गत ४ फिडर, तर रोशनगेट उपकेंद्रांतर्गत ३ फिडर बंद पडले. परिणामी, रोशनगेट, अजम कॉलनी, कटकटगेट, मकसूद कॉलनी, किराडपुरा, आझाद चौक या परिसरात सुमारे १५ हजार घरे अंधारात होती.तथापि, काही वेळातच महावितरणचे अधिकारी- कर्मचारी ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यासाठी पोहोचले; परंतु केवळ आमच्या परिसरातच भारनियमन का लादले जाते, असा प्रश्न उपस्थित करून तेथे मोठा जमाव जमला. त्यांनी महावितरणच्या अधिकारी- कर्मचाºयांना ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यास अडचण निर्माण केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी ही बाब तात्काळ पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, निरीक्षक निर्मला परदेशी आणि कर्मचाºयांनी तेथे धाव घेतली. तब्बल ३ तासांनंतर रात्री १० वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात विद्युतवाहिनी जोडण्याचे काम सुरू झाले.अमरप्रीत चौकातील उपकेंद्रावर धाव४मदनी चौक, रोशनगेट भागात झालेल्या तोडफोडीनंतर अमरप्रीत चौकातील महावितरणच्या कार्यालयावरही फकीरवाडी, बापूनगर, खोकडपुरा आणि चुनाभट्टी भागातील नागरिकांनी रात्री १०.३० वाजता धाव घेतली. दुपारी साडेतीन वाजेपासून वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. शिवाय महावितरणचे कर्मचारी फोन घेत नाहीत आणि वीज पुरवठा कधी सुरळीत होईल हे सांगत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. शेकडो नागरिक महावितरणच्या कार्यालयावर धडकल्याचे कळताच क्रांतीचौक पोलिसांनी तेथे धाव घेतली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण