शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:17 IST

किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला.

ठळक मुद्देमदनी चौैकातील घटना : आठ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांचा उद्रेक; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला. जमावाने उपकेंद्रावर दगडफेक करून तेथील सामानांची तोडफोड केली आणि कर्मचाºयांना धक्काबुक्की केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करून ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर सुमारे तासभर ठिय्या दिला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.रोशनगेट, जिन्सी, मध्यवर्ती जकात नाका आदी भागांत भारनियमनानंतरही विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचा संयम सुटला व जमावाने रोशनगेट उपकेंद्राची तोडफोड केली.सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुपारच्या सत्रातील भारनियमन बंद झाले आणि एकाच वेळी घराघरांतील विद्युत उपकरणे सुरू झाली. त्यामुळे विद्युत वाहिन्यांवर भार वाढला व मध्यवर्ती जकातनाका येथे स्मशानभूमीजवळ ३३ के.व्ही.ची वाहिनी तुटली. त्यामुळे बायजीपुरा उपकेंद्रांतर्गत ४ फिडर, तर रोशनगेट उपकेंद्रांतर्गत ३ फिडर बंद पडले. परिणामी, रोशनगेट, अजम कॉलनी, कटकटगेट, मकसूद कॉलनी, किराडपुरा, आझाद चौक या परिसरात सुमारे १५ हजार घरे अंधारात होती.तथापि, काही वेळातच महावितरणचे अधिकारी- कर्मचारी ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यासाठी पोहोचले; परंतु केवळ आमच्या परिसरातच भारनियमन का लादले जाते, असा प्रश्न उपस्थित करून तेथे मोठा जमाव जमला. त्यांनी महावितरणच्या अधिकारी- कर्मचाºयांना ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यास अडचण निर्माण केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी ही बाब तात्काळ पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, निरीक्षक निर्मला परदेशी आणि कर्मचाºयांनी तेथे धाव घेतली. तब्बल ३ तासांनंतर रात्री १० वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात विद्युतवाहिनी जोडण्याचे काम सुरू झाले.अमरप्रीत चौकातील उपकेंद्रावर धाव४मदनी चौक, रोशनगेट भागात झालेल्या तोडफोडीनंतर अमरप्रीत चौकातील महावितरणच्या कार्यालयावरही फकीरवाडी, बापूनगर, खोकडपुरा आणि चुनाभट्टी भागातील नागरिकांनी रात्री १०.३० वाजता धाव घेतली. दुपारी साडेतीन वाजेपासून वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. शिवाय महावितरणचे कर्मचारी फोन घेत नाहीत आणि वीज पुरवठा कधी सुरळीत होईल हे सांगत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. शेकडो नागरिक महावितरणच्या कार्यालयावर धडकल्याचे कळताच क्रांतीचौक पोलिसांनी तेथे धाव घेतली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण