शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:17 IST

किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला.

ठळक मुद्देमदनी चौैकातील घटना : आठ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांचा उद्रेक; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला. जमावाने उपकेंद्रावर दगडफेक करून तेथील सामानांची तोडफोड केली आणि कर्मचाºयांना धक्काबुक्की केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करून ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर सुमारे तासभर ठिय्या दिला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.रोशनगेट, जिन्सी, मध्यवर्ती जकात नाका आदी भागांत भारनियमनानंतरही विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचा संयम सुटला व जमावाने रोशनगेट उपकेंद्राची तोडफोड केली.सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुपारच्या सत्रातील भारनियमन बंद झाले आणि एकाच वेळी घराघरांतील विद्युत उपकरणे सुरू झाली. त्यामुळे विद्युत वाहिन्यांवर भार वाढला व मध्यवर्ती जकातनाका येथे स्मशानभूमीजवळ ३३ के.व्ही.ची वाहिनी तुटली. त्यामुळे बायजीपुरा उपकेंद्रांतर्गत ४ फिडर, तर रोशनगेट उपकेंद्रांतर्गत ३ फिडर बंद पडले. परिणामी, रोशनगेट, अजम कॉलनी, कटकटगेट, मकसूद कॉलनी, किराडपुरा, आझाद चौक या परिसरात सुमारे १५ हजार घरे अंधारात होती.तथापि, काही वेळातच महावितरणचे अधिकारी- कर्मचारी ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यासाठी पोहोचले; परंतु केवळ आमच्या परिसरातच भारनियमन का लादले जाते, असा प्रश्न उपस्थित करून तेथे मोठा जमाव जमला. त्यांनी महावितरणच्या अधिकारी- कर्मचाºयांना ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यास अडचण निर्माण केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी ही बाब तात्काळ पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, निरीक्षक निर्मला परदेशी आणि कर्मचाºयांनी तेथे धाव घेतली. तब्बल ३ तासांनंतर रात्री १० वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात विद्युतवाहिनी जोडण्याचे काम सुरू झाले.अमरप्रीत चौकातील उपकेंद्रावर धाव४मदनी चौक, रोशनगेट भागात झालेल्या तोडफोडीनंतर अमरप्रीत चौकातील महावितरणच्या कार्यालयावरही फकीरवाडी, बापूनगर, खोकडपुरा आणि चुनाभट्टी भागातील नागरिकांनी रात्री १०.३० वाजता धाव घेतली. दुपारी साडेतीन वाजेपासून वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. शिवाय महावितरणचे कर्मचारी फोन घेत नाहीत आणि वीज पुरवठा कधी सुरळीत होईल हे सांगत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. शेकडो नागरिक महावितरणच्या कार्यालयावर धडकल्याचे कळताच क्रांतीचौक पोलिसांनी तेथे धाव घेतली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण