शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:17 IST

किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला.

ठळक मुद्देमदनी चौैकातील घटना : आठ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांचा उद्रेक; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला. जमावाने उपकेंद्रावर दगडफेक करून तेथील सामानांची तोडफोड केली आणि कर्मचाºयांना धक्काबुक्की केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करून ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर सुमारे तासभर ठिय्या दिला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.रोशनगेट, जिन्सी, मध्यवर्ती जकात नाका आदी भागांत भारनियमनानंतरही विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचा संयम सुटला व जमावाने रोशनगेट उपकेंद्राची तोडफोड केली.सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुपारच्या सत्रातील भारनियमन बंद झाले आणि एकाच वेळी घराघरांतील विद्युत उपकरणे सुरू झाली. त्यामुळे विद्युत वाहिन्यांवर भार वाढला व मध्यवर्ती जकातनाका येथे स्मशानभूमीजवळ ३३ के.व्ही.ची वाहिनी तुटली. त्यामुळे बायजीपुरा उपकेंद्रांतर्गत ४ फिडर, तर रोशनगेट उपकेंद्रांतर्गत ३ फिडर बंद पडले. परिणामी, रोशनगेट, अजम कॉलनी, कटकटगेट, मकसूद कॉलनी, किराडपुरा, आझाद चौक या परिसरात सुमारे १५ हजार घरे अंधारात होती.तथापि, काही वेळातच महावितरणचे अधिकारी- कर्मचारी ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यासाठी पोहोचले; परंतु केवळ आमच्या परिसरातच भारनियमन का लादले जाते, असा प्रश्न उपस्थित करून तेथे मोठा जमाव जमला. त्यांनी महावितरणच्या अधिकारी- कर्मचाºयांना ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यास अडचण निर्माण केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी ही बाब तात्काळ पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, निरीक्षक निर्मला परदेशी आणि कर्मचाºयांनी तेथे धाव घेतली. तब्बल ३ तासांनंतर रात्री १० वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात विद्युतवाहिनी जोडण्याचे काम सुरू झाले.अमरप्रीत चौकातील उपकेंद्रावर धाव४मदनी चौक, रोशनगेट भागात झालेल्या तोडफोडीनंतर अमरप्रीत चौकातील महावितरणच्या कार्यालयावरही फकीरवाडी, बापूनगर, खोकडपुरा आणि चुनाभट्टी भागातील नागरिकांनी रात्री १०.३० वाजता धाव घेतली. दुपारी साडेतीन वाजेपासून वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. शिवाय महावितरणचे कर्मचारी फोन घेत नाहीत आणि वीज पुरवठा कधी सुरळीत होईल हे सांगत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. शेकडो नागरिक महावितरणच्या कार्यालयावर धडकल्याचे कळताच क्रांतीचौक पोलिसांनी तेथे धाव घेतली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण