शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रोगराईचे दुष्टचक्र

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

रमेश शिंदे , औसा मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेपोटी आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणखी एका दुष्टचक्रात सापडला आहे़

रमेश शिंदे , औसामृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेपोटी आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणखी एका दुष्टचक्रात सापडला आहे़ लांबलेला पाऊस आणि दररोज होणाऱ्या नवनवीन रोगांच्या प्रादुर्भावामुळे औसा तालुक्यातील उटी बु़ व परिसरातील शेतकरी भाजीपाला बाजारात विक्रीसाठी नेण्याऐवजी चक्क बांधावर टाकून विल्हेवाट लावत आहेत. उटी बु़ लखनगाव या परिसरात तावरजा नदी वाहते़ या तावरजा नदीवरच उटी बु़ गावानजीक तावरजा मध्यम प्रकलप आहे़ या प्रकल्पातील पाण्यामुळे परिसरातील शेती चांगलीच बहरली आहे़ उसासह भाजीपाला व अन्य पिकांचे उत्पन्न घेऊन शेतकरी आपल्या उत्पादनात वाढ करीत असल्याचे दिसून येत होता पण; मागील चार-पाच वर्षांपासून या परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तावरजा मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला नाही. या उन्हाळ्यात तर तो कोरडा पडला आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रही काही प्रमाणात मोडीत काढावे लागले़ यावर्षी काही प्रमाणात पाणीसाठा झाल्यामुळे तसेच पावसाळा लवकर सुरु होईल़ या आशेपोटी शेतकऱ्यांनी ऊस आणि भाजीपाल्याची लागवड केली़ पण आता विहिरीही कोरड्या पडल्या आणि पाऊसही नाही़ त्यामुळे ऊस वाळत आहे़ तर पाणी नसल्याने भाजीपाल्यावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे बाजारातही या भाजीपाल्याला भाव मिळत नाही. काही भाज्या तर विक्रीलायकही राहात नाहीत. त्यामुळे शेतकरी भाजीपाला उपटून बांधावर टाकून विल्हेवाट लावत आहेत.शेतकऱ्यांचे मोठे नुकसाऩ़़उटी बु़ येथील शेतकरी रामकृष्ण जाधव यांनी २ एकर उसाची लागवड केली़ यामध्ये अंतरपीक म्हणून पत्ताकोबीची लागवड केली़ यासाठी ३५ ते ४० हजार रूपये खर्च केले़ परंतु, मृगाच्या प्रारंभीच विहिरीत पाणी नसल्याने ऊस वाळत आहे़ तर कोबीच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ते काढून बांधावर टाकावे लागत आहे़ काहीतरी उत्पन्न हाती पडेल म्हणून लावलेल्या या भाजीपाल्याला पदरमोड करून रानाच्या बाहेर काढावे लागत असल्याने या दुहेरी चक्रातून शेतकरी सावरणार कसा, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली़