शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आदिवासींच्या प्रश्नांवर परिषदेत चर्चा

By admin | Updated: June 17, 2014 00:39 IST

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे १३ जून रोजी अखिल भारतीय आदिवासी महासभेच्या वतीने आदिवासी अधिकार परिषद घेण्यात आली.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे १३ जून रोजी अखिल भारतीय आदिवासी महासभेच्या वतीने आदिवासी अधिकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले.या परिषदेचे उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसरचिटणीस कॉ. प्रा. नामदेव कन्नाके (चंद्रपूर) यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सीताराम भोपे होते. यावेळी भाकपचे राज्य समुपदेशक कॉ. राजन क्षीरसागर (परभणी), भाकपचे हिंगोली जिल्हा सचिव आर.आर. कोर्डे, कॉ. किशनराव काशिदे, एम. एस. ई. बी. वर्कर्स फेडरेशनचे टी. के. टापरे, कॉ. पदमाकर लांडगे, हफीजखाँ पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातील आदिवासी समाजासमोरील समस्या, त्यांचे जीवनमान, सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणाचा आदिवासींच्या जीवनावर होणारा परिणाम या अनुषंगाने परिषदेत चर्चा झाली. यामध्ये जमीन सुधारणा व जमीन वाटपाचा प्रश्न, वन अधिकार कायद्याची अमलबजावणी, जमीन संपादन व विस्थापनाचा प्रश्न, आदिवासी जमीनीचे होत असलेले हस्तांतरण, आदिवासी शेतकऱ्यांसाठी खास योजनांची मागणी, आदिवासी क्षेत्रात रोजगार हमी योजना कायद्याची अंमलबजावणी, किरकोळ वन उत्पादनासाठी किमान समर्थन किंमती, आदिवासी कामगारांचे शोषण, आदिवासी तरुणांचा प्रश्न, सार्वजनिक सेवांमधील आरक्षणाचा प्रश्न, आदिवासी भागातील विकास व निधी देण्यातील सरकारचा भेदभाव, आरोग्य- शिक्षण, चुकीच्या अन्नधोरणाविरुद्ध लढा, घटनात्मक आणि राजकीय हक्कांचा प्रश्न, सामाजिक सुधारणा व आदिवासी स्त्रीयांचे अधिकार या देशव्यापी प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात वन कायद्याची अंमलबजावणी, गायरान जमीनीचे पट्टे नावाने करण्याची मागणी, रोजगार हमीची अंमलबजावणी, घरकुलाचा काळाबाजार, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी यादीचा घोळ, रेशन व रॉकेलचा काळाबाजार, पिण्याचे पाणी, शिक्षण, सामाजिक अत्याचार, स्त्रीयांचे प्रश्न सोडविण्याबाबत परिषदेमध्ये विचारवंतन करण्यात आले. येत्या काळात आदिवासी गावांच्या प्रश्नांवर राज्यपालांना भेटून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तसेच ९ आॅगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनी कळमनुरी येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)९ आॅगस्टला आंदोलनआदिवासी समाजासमोरील समस्या, त्यांचे जीवनमान, सरकारच्या धोरणाचा आदिवासींच्या जीवनावर होणारा परिणाम या अनुषंगाने परिषदेत चर्चा झाली. आगामी काळात आदिवासी गावांच्या प्रश्नांवर राज्यपालांना भेटून निवेदन देण्याचे या परिषदेत ठरविण्यात आले.