शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

वृक्ष संगोपनाच्या 'बिहार पॅटर्न'ची चर्चा; गरीब कुटुंबांच्या मदतीने गाव बनले 'ऑक्सिजन हब'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 17:44 IST

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे वृक्ष संगोपणासाठी राबविण्यात आला बिहार पॅटर्न

औरंगाबाद : वृक्षारोपणात दरवर्षी लाखो झाडे लावली जातात. परंतु, त्यापैकी किती झाडे जगतात हा खरा संशोधनाचा प्रश्न. पण, आता राज्य सरकारने यावर मार्ग शोधला आहे, तो बिहार पॅटर्नचा! सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वृक्ष संगोपनासाठी प्रथमच हा पॅटर्न राबविण्यात येत आहे. या पॅटर्नच्या यशाने अत्यंत कमी काळात गाव ऑक्सिजन हब बनले आहे. 

झाडे लावण्याबरोबर त्याचे संगोपन, संरक्षण करण्याची मोहीम 'मनरेगा'अंतर्गत राबवायची. त्यामुळे नागरिकांना हाताला कामही मिळेल आणि झाडेही जगतील. राज्यातील काही जिल्ह्यात हा प्रयोग राबविल्याने काही गावे टँकरमुक्त झाली. त्यामुळे 'बिहार पॅटर्न' यशस्वी होताना दिसतो.  सिल्लोड तालु्यात हा पॅटर्न राबवणारे  पिंपळगाव पेठ पाहिले गाव आहे. पिंळगावच्या स्मशानभूमी परिसरातपहिल्या टप्यात २०० झाडे लावण्यात आली आहेत. तर दोन वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत ३००० हजार झाडे लावण्यात आली होती, ती १५ ते २० फुटापर्यंत वाढली आहेत. गावकऱ्यांनी वेळेवर पाण्याची बचत व झाडांचे संगोपन केल्यामुळे ही झाडे जगली. गावातील विविध क्षेत्रातील व गावकऱ्यांच्या वतीने झाडे लावण्यात आली आहे. 

असा आहे 'बिहार पॅटर्न''बिहार पॅटर्न'अंतर्गत गावाच्या हद्दीत लावण्यात येणाऱ्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे दिली जाते. ग्रामपंचायतीमार्फत मनरेगांतर्गत गरीब कुटुंबांना काम देण्यात येते. मनरेगांतर्गत पहिले १०० दिवस २०० झाडांचे संगोपन आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या एका कुटुंबाला दरमहा सहा हजार ७५ रुपयांची रक्कम केंद्र सरकारमार्फत दिली जाते.  सन २०१९-२० मध्ये सामाजिक वनीकरण विभागांतर्गत विविध प्रकारची ३ हजार झाडे लावण्यात आली होती. त्या झाडांचे योग्य नियोजन व संगोपन केल्यामुळे आज ती झाडे १५ ते २० फुटापर्यंत वाढली आहेत. 

गाव बनले ऑक्सिजन हब या उपक्रमामुळे पिंपळगाव पेठ परिसरात अत्यंत शुद्ध असे वातावरण निर्माण झाले आहे. गाव प्रकारे ऑक्सिजन हब बनले आहे. यामुळे गाव परिसरात पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे, अशा प्रकारचा उपक्रम देशभरात राबविण्याची गरज असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण