शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वृक्ष संगोपनाच्या 'बिहार पॅटर्न'ची चर्चा; गरीब कुटुंबांच्या मदतीने गाव बनले 'ऑक्सिजन हब'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 17:44 IST

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे वृक्ष संगोपणासाठी राबविण्यात आला बिहार पॅटर्न

औरंगाबाद : वृक्षारोपणात दरवर्षी लाखो झाडे लावली जातात. परंतु, त्यापैकी किती झाडे जगतात हा खरा संशोधनाचा प्रश्न. पण, आता राज्य सरकारने यावर मार्ग शोधला आहे, तो बिहार पॅटर्नचा! सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वृक्ष संगोपनासाठी प्रथमच हा पॅटर्न राबविण्यात येत आहे. या पॅटर्नच्या यशाने अत्यंत कमी काळात गाव ऑक्सिजन हब बनले आहे. 

झाडे लावण्याबरोबर त्याचे संगोपन, संरक्षण करण्याची मोहीम 'मनरेगा'अंतर्गत राबवायची. त्यामुळे नागरिकांना हाताला कामही मिळेल आणि झाडेही जगतील. राज्यातील काही जिल्ह्यात हा प्रयोग राबविल्याने काही गावे टँकरमुक्त झाली. त्यामुळे 'बिहार पॅटर्न' यशस्वी होताना दिसतो.  सिल्लोड तालु्यात हा पॅटर्न राबवणारे  पिंपळगाव पेठ पाहिले गाव आहे. पिंळगावच्या स्मशानभूमी परिसरातपहिल्या टप्यात २०० झाडे लावण्यात आली आहेत. तर दोन वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत ३००० हजार झाडे लावण्यात आली होती, ती १५ ते २० फुटापर्यंत वाढली आहेत. गावकऱ्यांनी वेळेवर पाण्याची बचत व झाडांचे संगोपन केल्यामुळे ही झाडे जगली. गावातील विविध क्षेत्रातील व गावकऱ्यांच्या वतीने झाडे लावण्यात आली आहे. 

असा आहे 'बिहार पॅटर्न''बिहार पॅटर्न'अंतर्गत गावाच्या हद्दीत लावण्यात येणाऱ्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे दिली जाते. ग्रामपंचायतीमार्फत मनरेगांतर्गत गरीब कुटुंबांना काम देण्यात येते. मनरेगांतर्गत पहिले १०० दिवस २०० झाडांचे संगोपन आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या एका कुटुंबाला दरमहा सहा हजार ७५ रुपयांची रक्कम केंद्र सरकारमार्फत दिली जाते.  सन २०१९-२० मध्ये सामाजिक वनीकरण विभागांतर्गत विविध प्रकारची ३ हजार झाडे लावण्यात आली होती. त्या झाडांचे योग्य नियोजन व संगोपन केल्यामुळे आज ती झाडे १५ ते २० फुटापर्यंत वाढली आहेत. 

गाव बनले ऑक्सिजन हब या उपक्रमामुळे पिंपळगाव पेठ परिसरात अत्यंत शुद्ध असे वातावरण निर्माण झाले आहे. गाव प्रकारे ऑक्सिजन हब बनले आहे. यामुळे गाव परिसरात पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे, अशा प्रकारचा उपक्रम देशभरात राबविण्याची गरज असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण