शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महानंद चालविण्यासाठी 'एनडीडीबी'कडे देण्याची चर्चा, अद्याप निर्णय नाही- अजित पवार

By विजय सरवदे | Updated: February 23, 2024 17:22 IST

महानंद सहकारी दूध संघ चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबी) प्रस्ताव दिलेला आहे.

विजय सरवदे, छत्रपती संभाजीनगर : महानंद सहकारी दूध संघ चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबी) प्रस्ताव दिलेला आहे. त्यावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, विरोधक अभ्यास न करता उगीचच गैरसमज पसरवत आहेत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांस उपस्थित राहाण्यासाठी अजित पवार छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी सकाळी दाखल झाले तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना महानंद चालविण्यासाठी संधी दिली होती. त्यात ते अपयशी ठरले. आता ही डेअरी डबघाईला आली आहे. तिला उर्जितावस्था देण्यासाठी 'एनडीडीबी'ने प्रस्ताव दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तोटा भरून काढण्यासाठी सरकारने भागभांडवल द्यावे. व्यवस्थापन त्यांचे राहील. यापूर्वी जळगाव येथील डेअरी चालविण्यासाठी 'एनडीडीबी'ने घेतली होती. ती सुस्थितीत आल्यावर आता ती लोकप्रतिनिधी चालवतात. दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महानंद संबंधीचा निर्णय घेतला जाईल.

विरोधक मात्र, आता महानंदची मोक्याची ५० एकर जागा जाणार, ही डेअरी गुजरातच्या घशात घातली, असे थोतांड पसरवत आहेत. नेहमीच गुजरातच्या नावाने खडे फोडायचे, ही त्यांची निवडणुकीची लाईन ठरलेली आहे.

 छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेला सॉफ्ट लोन संदर्भात कळविले होते. पण, अतुल सावे यांनी सांगितले की, कर्जाची परतफेड करण्याची मनपाची क्षमता नाही. त्यामुळे यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही तिघेही बसून व्यावहारिक मार्ग काढू.

या जिल्ह्या वार्षिक योजनेसाठी सध्या ५६० कोटींचा निधी आहे. मात्र, हा निधी अपुरा असून तो वाढवून देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. पुढील वर्षी समाधानकारक वाढीव निधी दिला जाईल. पोलिस आयुक्तालयातील शस्त्रागार ईमारत मोडकळीस आल्यामुळे नवीन ईमारतीसाठी आयुक्तांनी ७० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिव्यांग भवन उभारण्यासाठी ५० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी त्यासाठी१० कोटींची तरतूद केली आहे. राज्यात अशी सहा ठिकाणी दिव्यांग भवने उभारण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाईल.यावेळी पालकमंत्री संदीपान भूमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. सतिष चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकर आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस आयुक्त मनोज लोहिया उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकार