शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

चर्चा वांझोटी; कचरा औरंगाबाद शहरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:24 IST

नारेगावातील डेपोत कचरा टाकण्याच्या विरोधात आठ दिवसांपासून आसपासच्या गावांतील नागरिकांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केलेली मध्यस्थी शुक्रवारी अपयशी ठरली.

ठळक मुद्देपालकमंत्री सावंत आले आणि गेले : शहरातील कचरा कुठे टाकायचा यावर आठ दिवसांपासून निघेना तोडगा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगावातील डेपोत कचरा टाकण्याच्या विरोधात आठ दिवसांपासून आसपासच्या गावांतील नागरिकांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केलेली मध्यस्थी शुक्रवारी अपयशी ठरली. वांझोट्या चर्चेचे राजकीय गुºहाळ दीड तास चालल्यानंतरही शहरातील कचरा शनिवारपासून कुठे टाकायचा, याबाबत काहीही निर्णय झाला नाही. विभागीय व जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस यंत्रणा आठ दिवसांपासून या विषयावर बैठकीच्या सत्रात अडकली असून, काहीही तोडगा निघत नसल्यामुळे शहराची पूर्णत: कचराकोंडी झाली आहे. दबावासमोर प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली असून दुसरीकडे शहरात कचºयाचे ढीग निर्माण होत आहेत.गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात कचरा प्रश्नी चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. सावंत शुक्रवारी विमानतळावरून थेट नारेगावातील आंदोलनस्थळी पोहोचले. तेथे त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी विनंती केली. काही दिवस डेपोतील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी लागतील. तेवढा वेळ त्यांनी आंदोलकांकडे मागितला; परंतु आंदोलकांनी त्यांच्या त्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंदोलकांशी चर्चा निष्फळ ठरली. त्या चर्चेत आंदोलकांना कुठलेही ठोस आश्वासन न दिल्यामुळे आंदोलक विभागीय आयुक्तालयात चर्चेला आले नाहीत.पालकमंत्र्यांसह पालिका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महसूल, पोलीस अधिकाºयांचा ताफा विभागीय आयुक्तालयात पोहोचला. तेथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेते विकास जैन, सभापती गजानन बारवाल, नगरसेवक राजू शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनपा आयुक्त डी.एम.मुगळीकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, आदींच्या उपस्थितीत कचरा कुठे टाकायचा, यावर खल झाला; परंतु तोडगा निघाला नाही.पालकमंत्री डॉ.सावंत म्हणाले...बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी दीड मिनिटे संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही गावकºयांना आवाहन केले होते; परंतु ते चर्चेला आले नाहीत, हे खरे आहे. आमच्याकडे दोन ते तीन जागा आहेत. त्या जागांचा आढावा घेऊन तीन ते चार दिवसांत व्यवस्था केली जाईल, ती करू. प्रक्रिया प्रकल्पाला पाच महिन्यांचा कालावधी लागेल. त्याचा प्रशासकीय कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठेही कचरा टाकू दिला जात नाही, शनिवारपासून काय तयारी केली आहे, यावर डॉ. सावंत म्हणाले, कचरा टाकण्यास उद्या सुरुवात होईल. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न जातो, येथील यंत्रणा असक्षम आहे काय, असे विचारले असता पालकमंत्री म्हणाले, असे काही नाही.मनपाच्या मालकीची जागा असताना तेथे राजकारण केले जात आहे का? या प्रश्नावर डॉ. सावंत यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरही मार्ग निघेनामुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काही महत्त्वपूर्ण आश्वासने दिल्यानंतरही शुक्रवारी कचरा डेपो प्रकरणात ठोस असा निर्णय झाला नाही. यामागे नेमके राजकारण काय आहे? फुलंब्री मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळाच्या आजूबाजूला हा मुद्दा फिरत असल्याचा आरोप शिवसेनेने बुधवारी केला होता. पालकमंत्री डॉ.सावंत हे मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणूनच शुक्रवारी आले असताना नारेगाव आणि विभागीय आयुक्तालयातील बैठका निष्फळ ठरल्यामुळे शहरातील कचरा कोंडी केव्हा फुटणार असा प्रश्न आहे.आयुक्त म्हणतील तेथे कचरा टाकूशनिवारपासून कचरा कुठे टाकणार, असा प्रश्न पत्रकारांनी मनपा आयुक्त मुगळीकर यांना विचारला असता ‘विभागीय आयुक्त डॉ. भापकर सांगतील तेथे कचरा टाकू’ असे म्हणून त्यांनी हात झटकले. यावर डॉ. भापकर यांना विचारले असता ते म्हणाले, मी कसे सांगणार कचरा कुठे टाकायचा. बळाचा वापर करून नारेगावात कचरा टाकायचा का?, असा प्रश्न मुगळीकर यांना विचारला असता, मुगळीकर म्हणाले, ‘बळाचा वापर केला पाहिजे’. मात्र काही क्षणातच मुगळीकर यांनी विधान मागे घेतले. या प्रश्नोत्तरात जिल्हाधिकारी एन. के. राम यांनी मध्यस्थी करीत तीन जागांचा पर्याय मांडला.जिल्हाधिकारी म्हणाले...जिल्हाधिकारी एन. के. राम म्हणाले, नारेगाव, बाभूळगाव आणि सफारी पार्क परिसरात कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा समोर आल्या आहेत. यातील एका ठिकाणी शनिवारपासून कचरा टाकण्यास सुरुवात होईल. नारेगाव डेपोत कचरा टाकण्यासाठी बळाचा वापर करणे किती योग्य राहील, याबाबत विचार केला जाईल. परंतु तेथील नागरिकांनी सुरू केलेला विरोध हादेखील योग्य नाही, असे माझे स्पष्ट मत असल्याचे जिल्हाधिकारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.