शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

अपंग मुलाला टाकले कंपनीच्या दारात

By admin | Updated: June 21, 2016 01:10 IST

औरंगाबाद : औषधोपचाराचा खर्च झेपत नसल्याने संतप्त झालेल्या कामगार पित्याने आपल्या अपंग मुलास चक्क युनायटेड स्पिरिट या कंपनीच्या दारातच आणून टाकल्याची घटना सोमवारी घडली.

औरंगाबाद : औषधोपचाराचा खर्च झेपत नसल्याने संतप्त झालेल्या कामगार पित्याने आपल्या अपंग मुलास चक्क युनायटेड स्पिरिट या कंपनीच्या दारातच आणून टाकल्याची घटना सोमवारी घडली. लाला शिंदे, असे या कामगाराचे नाव असून, त्यांच्यासह २२ जणांना जानेवारी महिन्यात कामावरून काढून टाकण्यात आले होते.मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील युनायटेड स्पिरिटची डायगो या अमेरिकन कंपनीस विक्री केली आहे. डायगोकडे कंपनीचे हस्तांतरण करण्यापूर्वी कामगारांचा वेतनवाढीसाठी लढा सुरू होता. यावरून १८ जानेवारी रोजी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्यांपैकी २२ जणांना कंपनीने २३ जानेवारीपासून कामावरून काढून टाकले. लाला शिंदे, सुरेश मेश्राम, नंदकिशोर वाणी, जयेंद्र हिवराळे, सुरेश हिवराळे, रमेश इंगळे, राजू तुपे, सोमीनाथ ससाणे, अलका मगरे, कृष्णा कांबळे, बाबूराव पगारे, रवी खंडाळे, भास्कर जाधव आदींचा यात समावेश आहे. काढून टाकण्यात आलेले २२ कामगार हे गेल्या १८ वर्षांपासून कंपनीच्या सेवेत आहेत, हे विशेष. घरी नेणार नाहीलाला शिंदे यांच्या पत्नी अलका यांनी दुपारी अडीच वाजता अक्षयला घेऊन कंपनी गाठली. ‘आपल्या पतीला नोकरीला घ्या, नसता मुलाला येथेच सोडते,’ असे म्हणून त्यांनी अक्षयला एका कंपनीच्या दरवाजात चादरीवरच झोपविले. सायंकाळी सात वाजेपर्यंत या प्रतिनिधीने ‘युनायटेड स्पिरिट’ला भेट दिली असता, आजारी असलेला अपंग मुलगा दरवाजातच पडून असल्याचे दिसून आले. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. अलका शिंदे यांनी सांगितले की, ‘अक्षयच्या पालनपोषणासाठी दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येतो. पतीला कामावरून काढून टाकण्यात आल्याने संपूर्ण कुटुंबाचीच आबाळ होत आहे. अशा परिस्थितीत अपंग मुलाचा सांभाळ करणे अत्यंत कठीण होत आहे.’ कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली. ‘तुमच्या पतीला येत्या १ जुलैपासून कामावर घेऊ, पण मुलाला येथून घेऊन जा,’अशी मागणी त्यांनी केली. परंतु लगेचच कामावर रुजू करून घेतल्याशिवाय मुलाला परत घेऊन जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.या घटनेची माहिती सर्वत्र पसरली. त्यामुळे कंपनीने काढून टाकलेले सर्व २२ कामगार येथे जमा झाले. कंपनीच्या गेटवर सुरक्षारक्षक तसेच काही बाऊंसरही हजर होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.